Thursday, August 14, 2014

स्वातंत्र्य

किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला

तरुणान्नि तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले


आइने मुलाचे दान दिले
विवहितेने सौभाग्य पनाला लावले
तरुणिन्निही शस्त्र धारण केले
देशलाच आपला दागिना मानले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले.

----archana sonagre 

2 comments:

प्रकाश पोळ said...

अतिशय छान कविता आहे.......अर्चनाजी आपल्या कविता ब्लोगच्या वाचकाना नक्कीच आवडतील.....

archana sonagre said...

धन्यवाद