Tuesday, September 22, 2015

मराठी कविता - सुभेदार मल्हारराव होळकर (Subhedar Malharrao Holkar)



Milind Dombale (Deshmukh) । Marathi Kavita । Subhedar Malharrao Holkar
मिलिंद डोंबाळे (देशमुख) । मराठी कविता । सुभेदार मल्हारराव होळकर 

Wednesday, September 9, 2015

Sri Sant Ramjibaba (श्री संत रामजीबाबा)


पुणे शहराच्या लगतच चिंचवड गावापासून अगदी जवळच असलेल्या चांदखेड ता. मावळ या गावी पेशवाईचे काळात धनगर (खाटीक) या समाजात रामजीबाबा नावाचे एक संत पुरुष होऊन गेले. रामजीबाबांचा व्यवसाय म्हणजे मेंढरांचे पालन-पोषण करणे हा पिढीजात धंदा होता. खंडोबाची उपासना त्यांच्या घराण्यात परंपरेने चालू होती. त्या उपसनेमधूनच त्यांच्या ठिकाणी असे काही वैराग्य निर्माण झाले की, संसारी असून देखील ते विरागी बनले. प्रभूचिंतनात त्यांचा सर्व काळ जात असे व चिंतनामधूनच त्यांना ईश्वर प्राप्ती झाली.

रामजीबाबा हे चांदखेड गावातील घोलप घराण्यातील. घोलप घराणे खंडोबाचे भक्त होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चांदखेड या गावीच झाला. रामजीबाबांचा संसार मावळ तालुक्यातच होता. त्या भागातील लोकांना वाटले की, संत तुकारामांनंतर हा एक त्यांच्याच मार्गाने जाणारा कोणीतरी दिव्य साधुपुरुष आपल्यामध्ये आवतरला आहे. त्यामुळे तेथील लोक बाबांच्या भजनी लागले. रामजीबाबांनी त्यांच्या आयुष्यात काही चमत्कार केल्याचे दाखले नाहीत. परंतु एकही चमत्कार न करतां देखील केवळ भक्तीमार्गांमुळे हजारो लोक त्यांच्या भजनी लागले होते.

रामजीबाबांनी तुकाराम महाराजांचे प्रमाणेच प्रपंच साधून परमेश्वाची सेवा व आराधना केली. रामजीबाबांची ओळख त्यावेळच्या समाज बांधवांना पटली नाही. परंतु समाजाच्या अत्यंत कठीण अवस्थेत त्यांनी लोकांना धीर दिला व भक्तीमार्गाने संकटाला सामोरे जाण्याचे शिकवले. काही लोकांनी त्यांची अवहेलना केली परंतु संताना देखील काही काळ अनुकूल असावा लागतो. त्या काळात अनेक संत महात्मे होऊन गेले. रामजीबाबा हे खंडोबाचे परमभक्त म्हणून ओळखले जावू लागले. समाजाला मार्गदर्शन करुन त्यांनी खंडोबाची भक्ती करण्याचा उपदेश केला.

रामाजीबाबा यांनी चांदखेड या गावीच आपला देह ठेवला व ते वयाच्या ५४ व्या वर्षी खंडोबाचे चरणी विलीन झाले. तो दिवस म्हणजे पौष शुध्द पौर्णिमेचा होता. दरवर्षी या तिथीला रामजीबाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरी केली जाते. महाराष्ट्रात शेकडो भक्त त्याठिकाणी जमतात. भजन, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतात. मुंबई येथील सर्वश्री बेंद्रे, खराटे, घोणे, घोडके या घराण्यातील लोक मोठ्या संख्येने येवून हा पुण्यतिथीचा सोहळा पार पडतात. समाजातील बाबांच्या भक्तांनीच चांदखेड येथील समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करुन भव्य सभा मंडप उभारला आहे.

अशा थोर संताचे चरणी आमचे विनम्र अभिवादन -  
पवित्र जे कुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास जन्म घेती ।। 
कर्म धर्म त्याने झाला नारायण । त्याचेचि पावन तिन्ही लोक ।।  

संकलन - मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
www.milind-dombale.blogspot.com 
(टिप - सदरचा लेख मी लिहिला नसून, एका जुन्या पुस्तकात तो प्रकाशित झाला होता व ते पृष्ठ फक्त माझ्या हातीं लागले. प्रयत्न करुनही लेखक व पुस्तकाचे नाव कळू शकले नाही. जर कोणास लेखक किंवा पुस्तकासंबधी काही माहिती असल्यास जरुर कळवावे)

Saturday, September 5, 2015

Dr. Santuji Ramji Lad (डॉ. संतुजी रामजी लाड)

 

डॉ. संतुजी रामजी लाड हे एक थोर समाजसेवक व नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले तसेच महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सोबत त्यांनी मोलाचे समाजकार्य केले. डॉ. संतुजी लाड यांच्या जीवनकार्यांचा घेतलेला हा एक संक्षिप्त आढावा;

इ.स. १८४१ मध्ये एका खाटीक-धनगर कुटुंबात जन्मलेल्या संतुजी यांनी ठाण्याच्या मिशनरी शाळेत आपले शिक्षण घेतले. त्यानंतर डॉ. कीर्तीकर यांच्याकडे त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला व एक निष्णात डॉक्टर बनले. डॉ. संतुजी लाड यांच्या जीवनाचा अभ्यास करताना त्यांचा 'सत्यशोधक समाज' आणि 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ' यांच्याशी आलेला संबंध व त्या माध्यमांतून ​​त्यांनी केलेले समाजकार्य यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. 

डॉ. संतुजी लाड आणि सत्यशोधक समाज :
डॉ. संतुजी लाड यांच्या जीवनावर कायम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव राहिला. त्याच विचारांमुळे डॉ. संतुजी लाड सत्यशोधक समाजाकडे आकर्षिले गेले आणि पुढे सत्यशोधक समाजाचे एक आघाडीचे नेते बनले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे समाजकार्य केले.​ सत्यशोधक समाजाच्या इ.स.१८८५ च्या ठाणे येथील वार्षिक उत्सवात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. नाशिक येथे इ.स.१९१२ साली भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. फुले यांच्या उपदेशाची सत्यता, उपयुक्तता व आवश्यकता यांचा आपल्यावर प्रभाव पडला व त्यानुसार आपण वर्तन करतो, असे त्यांनी म्हटले होते. ठाणे येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या अधिवेशनाचा खर्च डॉ. संतुजी लाड यांनी केला होता. 'दीनबंधू' ह्या साप्ताहिक मुखपत्र त्याकाळी चालविले जात असे. पण काही आर्थिक कारणांनी ते डबघाईला आले. त्यावेळी 'दीनबंधू' या वृत्तपत्राला त्यांनी आर्थिक मदत करून हे वृत्तपत्र बंद पडू दिले नाही. 'दीनबंधू' हे साप्ताहिक मुखपत्र पुन्हा नव्याने सुरु झाले, पण त्यासाठीं डॉ. संतुजी लाड यांना आपली सर्व संचित संपत्ति खर्चावी लागली होती. 'दीनबंधू'ने  इ.स.१८९६ च्या २३ फेब्रुवारीच्या अंकात डॉ. संतुजी लाड यांचा 'प्रथम-भाषणकार' असा उल्लेख केला होता. 

डॉ. संतुजी लाड आणि भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ:
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यांसाठी स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळामध्ये डॉ. संतुजी लाड हे एक महत्त्वाचे मार्गदर्शक व साहाय्यकारी होते. तसेच मंडळाच्या पाच आद्य संस्थापकांपैकी डॉ. संतुजी लाड हे एक होते. त्या पाच ही संस्थापकांची नावे व पदे पुढीलप्रमाणे ; १. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे (सरचिटणीस), २. सर नारायण चंदावरकर (अध्यक्ष), ३. शेठ दामोदरदास सुखडवाला (उपाध्यक्ष), ४. नारायणराव पंडित (खजीनदार) आणि ५. डॉ. संतुजी रामजी लाड (अधीक्षक). भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ अनेक सामाजिक तसेच प्रबोधनात्मक उपक्रम चालवत असे, त्याचाच भाग म्हणून मंडळाने इ.स. २२ नोव्हेंबर १९०६ ते इ.स.१९०८ च्या अखेर पर्यंत परळ येथे एक मोफत दवाखाना चालवला होता. ​​या दवाखान्यात डॉ. संतुजी लाड स्वतः रोज सकाळी ठाण्याहून स्वखर्चाने येत असत. त्यासाठीचा प्रवासखर्चही ते कधी मंडळाकडून घेत नसत. अस्पृश्तेचे प्रमाण त्या काळात अधिक होते. अस्पृश्य वर्गातील रोग्याला डॉक्टर साधे शिवूनही घेत नसत. पण त्या काळात डॉ. संतुजी लाड अस्पृश्य रोग्याला शिवून, अतिशय प्रेमळपणाने त्याची तपासणी करीत असत व उपचार करुन औषध देत असत. डॉ. संतुजी लाड यांच्या सेवावत्तीबद्दल व त्यांनी केलेल्या साहाय्याबद्दल महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना फार कृतज्ञता वाटत होती. डॉ. संतुजी लाड ह्यांच्या जोडीने डॉ एस.पी.नाशिककर हे ही मंडळाच्या दवाखान्याचे काम पाहत असत. डॉ. संतुजी लाड केवळ दवाखान्यातच उपचार करत असत असे नव्हते, तर ते आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार देखील करत असत. या वैद्यकीय कार्यांव्यतिरिक्त डॉ. संतुजी लाड यांनी ठाणे येथे रात्रीची शाळाही चालवली होती. 

डॉ. संतुजी लाड हे दीनदुबळ्यांना मदत करायला सदैव तत्पर असत. स्वभावाने अतिशय प्रेमळ असणारे डॉ. संतुजी लाड कोणीही संकटांत सापडला असे कळले की, त्याच्या साहाय्यासाठी धावत असत. आपल्या संपत्तीचा उपयोग  त्यांनी सार्वजनिक कामासाठी व गोरगरिबांच्या साहाय्यासाठीच केला. पंढरपूर ऑर्फनेजमधून त्यांनी दोन मुली समाजाकडून मागून घेतल्या व त्यांचें प्रतिपालन करून त्यांची लग्नेंही लावून दिली. सेवानिवृत्ती नंतरच्या काळात देखील मुंबई येथील मराठा प्लेग हॉस्पिटलमध्ये 'हाऊस-सर्जन' म्हणून त्यांनी काम केले. प्लेग हॉस्पिटलांत संपर्कात आलेल्या एका मुलाचे त्यांनी स्वतः उत्तम रीतीने संगापेन केले होते. अत्यंत निस्वार्थीपणाने समाजाची शेवटपर्यंत सेवा करणाऱ्या डॉ. संतुजी लाड यांचे कार्य वाखाण्याजोगेच आहे. अशा ह्या थोर समाजसेवकाचे इ.स. १९१६ च्या अखेरीस पक्षाघाताच्या विकाराने निधन झाले. 

डॉ. संतुजी लाड यासारख्या एका निस्वार्थी थोर समाजसेवकाचे कार्य आपणां सर्वांपर्यंत पोहोचावे एवढीच हा लेख लिहिण्यामागील माफक अपेक्षा ! 

- मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
www.milind-dombale.blogspot.com​

संदर्भ - 
१. Website - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई प्रस्तुत : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे -​ समग्र साहित्य 
२. Website - Prabodhankar K S Thackeray's Life & Literature, Official Website 
३. Book - 'Shahu Chhatrapati : A Royal Revolutionary' (1976) By Dhananjay Keer 
४. Book - Jotirao Phule (1996) By Tarkteerth Laxmishastri Joshi, Daya Agarval 
५. Book - 'Non-Brahman Movement In Maharashtra' (1989) By M.S.Gore

Friday, August 28, 2015

मल्हारतंत्र

श्रीमंत सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचा सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा अर्थात 'मल्हारतंत्र' ! 'सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा', ‘होळकरांचा-गनिमीकावा', 'होळकरी-कावा' किंवा 'मल्हारतंत्र' अशा अनेक नावांनी परिचित असलेला गनिमीकाव्याचा हा प्रकार 'मल्हारतंत्र' या नावानेच जास्त ओळखीचा आहे.

मल्हारबांच्या घोड्यांच्या टापांनी जवळपास अवघा भारत पिंजून काढला. मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे गरुडस्तंभ ठरलेल्या मल्हाररावांनी अनेक युद्धात हेच तंत्र वापरले. दिल्लीच्या तख्तावर वर्चस्व ठेवले. त्यांच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनीही पुढे याचाच वापर केला. मॉन्सनचा भीषण पराभव हे देखील याचेच उदाहरण !

होळकरांच्या या तंत्राविषयी प्रसिद्ध इतिहासकार श्री. यशवंत वासुदेव खरे (ऐतिहासिक लेख संग्रह - १५) लिहितात  -  “होळकरांचा गनिमीकावा विचित्र होता.  मैदानात समोरासमोर इंग्रजाशी लढण्याच्या भानगडीत पडत नसे. पहिल्याने घोडेस्वाराच्या लहान लहान टोळ्या दिसू लागत या लहान टोळ्याच्या पाठीशी घोडेस्वाराच्या मोठमोठ्या टोळ्या असत. इंग्रजी फौज चालून आली तर हे घोडदळ पळू लागे. इंग्रजी फौजेची पाठ वळताच हजारो मराठे घोडेस्वार चहूकडून हल्ले करीत आणि पिछाडीवर लांडगेतोड करीत. शत्रूभोवती घिरट्या घाल घालून मराठे संधी सापडेल तेंव्हा शत्रूची कत्तल करीत...” (सदर पुरावा उपलब्ध करून दिला तो आमचे पुणे स्थित मित्र सचिन शेंडगे यांनी…)

प्रसिध्द इतिहास संशोधक व लेखक श्री. संजय सोनवणी यांचे देखील मल्हारतंत्राविषयी मत आपण जाणून घेऊयात, त्यांच्या 'धनगर-गवळ्यांच्या अवनतीचा कालखंड' या त्यांच्या प्रकाशित लेखामध्ये ते लिहितात - "मल्हाररावांनी उत्तर तुडवली. सपाट प्रदेशातील गनीमी कावा विकसीत केला...इतका कि त्याला "मल्हारतंत्र" म्हटले जाते. पानिपत युद्धात गेलेली मराठेशाहीचे पत काही महिन्यांत परत मिळवली. इंग्रजांनाही गनीमी काव्यानेच धुळ चारली."

तसेच श्री. संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरीत्र पुस्तकात ते लिहितात - "यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो हे खोटे आहे, हे त्यांनी सिध्द करुन दाखवले. मॉन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा खरेतर होळकरी-काव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युध्दशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पाळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून, भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत, तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत न्हेत कसे संपवावे, याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारां पेक्षाही अधिक ठार झाले."

तरी देखील गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो असे म्हणणाऱ्यांना काय म्हणावे ?

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com

Monday, June 8, 2015

बापू बिरू वाटेगावकर


मराठी कविता । बापू बिरू वाटेगावकर । मिलिंद डोंबाळे (देशमुख)  
Marathi Kavita । Bapu Biru Vategaonkar । Milind Dombale (Deshmukh)

Wednesday, May 6, 2015

ऐसी थी महान, महारानी माँ अहिल्याबाई...

                           
                                   
                                                      
ऐसी थी महान , महारानी माँ अहिल्याबाई...

समाज का अंधकार नष्ट करके ,
परिवर्तन की ज्योत लायी !

पूरब से पच्छिम तक , उत्तर से दक्षिण तक,
जनहित के लिए , स्वार्थ बिना कार्य करते आयी !

सभी धर्म - जातियों - भाषाओंका का सन्मान करते हूए ,
सर्वधर्मसमभाव का आदर्ष लेकर आयी !

ऐसी थी महान , महारानी माँ अहिल्याबाई...

कई मार्गो , पुलों , जलाशयों , धर्मशालाओं निर्माण कराकर ,
एक बड़ी सामाजिक आवश्यकता की पूर्ति कराई !

तिस साल तक शांतिपूर्वक विशाल राज्य का ऐश्वर्य बढ़ाई...
सभी जाती , वर्ग , समाज , भाषा तथा देश - विदेश में प्रशंसा पायी !

दान - धर्म और 
'समान न्याय ' देते हूए ,
अहिल्याबाई से 'अहिल्या ' 'देवी ' बन गयी !

थी ऐसी महान , महारानी माँ अहिल्याबाई... 
 
- सुदर्शन अक्कीसागर 

Wednesday, January 14, 2015

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर..तमाम बहुजन समाज बांधवांचं स्फुर्तीस्थान..

अहिल्यामातेच्या गौरवशाली इतिहासानं धनगरांची छाती अभिमानाने फुलुन जाते. अहिल्यामातेनं अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सर्व धार्मिक रूढी परंपरांना छेद देत तब्बल तीन दशके न्यायाचं आणि समतेचं राज्य करून तमाम राज्यकर्त्यांसमोर एक वेगळा आदर्श घालून दिला. अहिल्यामातेच्या इतिहासातील प्रत्येक प्रसंग पुढील राज्यकर्त्यांसाठी प्रमाण ठरला. मगं त्यांनी राबवलेली सात-बारा पध्दत असो कि पांढऱ्या घोंगडीवर बसून दिलेला न्याय असो..अहिल्यामातेनं देशभरातील कित्येक

Monday, January 12, 2015

सामाजिक, राजकीय गुन्हे असणार्या धनगर बांधवांसाठी....

धनगर समाज बांधवांनी 1 मि. वेळ काढून वाचाच.
जय मल्हारमाझ्या निधङ्या छातीच्या जिगरबाज धनगरभावांनो "
ङॉ शशिकांत तरंगे ---"चा मानाचा जय मल्हार 

तुमच्याच जिवावर आपण या भोळ्या धनगराला आरक्षण मिळवुन देणार आहोत यात कुणीही शंका घेउच नये .त्यासाठीच मला पुन्हा तुमची साथ हावी आहे जी तुम्ही बारामतीच्या अंदोलना काळात दिली होतीआणि तुमच्या मुळेच महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील धनगर रस्तावर आला आणी महाराष्ट्राला धनगरी बाणा दाखवून दिलापरंतु भाऊनो ते आंदोलन करताना तुम्हाला खुप

Friday, January 9, 2015

धनगर आरक्षण- नागपूर अधिवेशन

यलकोट यलकोट जय मल्हार चा गगनभेदी नारा देत महाराराष्ट्राच्या कानाकोपर्यातील धनगर बांधव व महिला भगिनी गल्यात पिवला रूमाल टाकून नागपुरच्या धनगर अधिवेशनात सामील झाला बघता बघता मैदान खचाखच भरले जिकडे तिकडे फक्त पिवले वादल
मंचावर डॉ विकास महात्मे व त्यांची टीम विराजमान होती सुत्रसंचलन सौ डॉ सुनिता महात्मे यांच्याकडे होते तर धनगर आमदार रामराव वडकुते रामहरी रुपवनर गणपतराव देशमुख गृहमंत्री ना रामजी शिंदे तसेच ना संजय राठोड व आमदार चैनसूख संचेती उपस्थित होते 

🌴धनगर जमात आणि जाग्रुती 🌴

धनगर जमाती च्या आजच्या परिस्थितीचे अवलौकन केल्यास  असे लक्षात येते की, या जमाती मध्ये जाग्रुतीची मशाल पेटली आहे. माञ यामध्ये  सामाजिक  जागृती सोबतच राजकीय  जाग्रुतीला महत्त्व देणे अत्यावश्यक आहे. सर्वांगिण प्रगतीची गाडी सामाजिक  जाग्रुतीच्या ट्र्याक वरुन धावत असताना  राजकीय  सत्तेच्या पावरची साथ असल्यास तिचा वेग वाढविणे  शक्य होईल हे सत्य आहे .धनगरांचा  पारंपारिक  शञू  मराठा

🌼सत्कार स्वीकारणारे सुपात ! सत्कार करणारे, मेळाव्यामधे भाषण ठोकणारे जात्यात !! तर समाज गोत्यात येणाऱ्या काळाकडे वाटचाल !!! 🌼

बहूचर्चीत नागपुर सत्कार मेळावा सुंदर झाला ! विरोधाभास निर्माण होऊनही समाजाने ठरवून घेतले काहीही करा परंतु आरक्षणापासून अता आम्ही माघार घेणार नाही !! पोटात एक व ओठात दुसरे असणाऱ्या पक्षांच्या भुमिका अता तो ओळखुन आहे ! अधिवेशनात निर्माण झालेला संभरंभ दूर करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी नागपुर च्या मेळाव्या प्रयंत वाट पाह्याला लावली हे खटकणारे होते ! त्यामुळे त्यांना क्लीपस दाखवुन आठवण घट्ट केल्याचा आनंद समाजाने लुटला !! सद्याच्या स्थीतीत विरोधी पक्षांनी आपली भुमिका निभावली असेच म्हणावे लागेल कारण शरद पवारांनी

Sunday, January 4, 2015

धनगर समाजाला दिलेला शब्द सरकार पाळेल... - मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस


धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशन - नागपूर, दि. 04/01/2015 

 ( साभार : दै. लोकमत समाचार, नागपूर, दि. 05/01/2015)

 
(साभार : दै. पुण्यनगरी, नागपूर, दि. 05/01/2015)
 -------------------------

( Video Links ... साभार : ABP माझा व Tv 9 महाराष्ट्र ) 
  
 
 

 

Friday, January 2, 2015

जानकर साहेबाना मंत्रीपद मिळालेच पाहिजे

बापू हटकर 

महादेव जानकर यांनी बीजेपीकडे कैबिनट मंत्री पद मगितले आहे ही मागणी योग्य आहे का? यावर माझ उत्तर होय असे होय खर तर ही मागणी या व्यासपीठावरुन सर्वात आधी मीच केली होती. जानकरांची प्रतिज्ञा मी राज्यात येणार नाही, राष्ट्रीय पातलीवरच राजकारण करणार. या प्रश्नांची कोंडी फोडून जानकर साहेबानी राज्यात मंत्रिपद स्वीकाराव म्हणून त्यांच्यावर दबाव आणा असी सूचना मांडल्यावर सुरवातीला काही मित्रानि विरोध केला. हळू हळू विरोध