Saturday, August 16, 2014

आम्ही धनगर

लाजत बुजत जगत आलोय आम्ही
मुळ प्रवाहापासुन दुर राहलो आम्ही
रानोवनी भटकंति आमची जिवन गाणी
मेढपाळ म्हनुन सर्वान्ना ओळख आमची
येळकोट येळकोट गर्जना आमची
खंडोबाच्या चरणी श्रद्धा आमची


जे मिळेल त्यावर समाधानि होतो आम्ही
जे मिळाले इतरान्ना त्याचिच केलि होति मागणी
पण आम्हाला कुणी गम्भिरपणे घेतलेच नाही
आम्हिहि हवि तशी लढत दिलिच नाही
एका छत्राखालि एकत्र कधि आलोच नाही

पण आता सावधान व्हावे 'र ' ला 'ड ' माननार्यान्नी
दुधारि तलवारिने आमच्यावर वार करनार्यान्नी
आतापर्यंत सहन केलेले पुढे सहन होणार नाही
न्यायच हवा आता , न्यायच हवा आता
वाट पाहत राहण्याचि आमचि इच्छा नाही
जे भोगले आम्ही ते पुढिल पिढिच्या वाट्याला येणार नाही

पिवळे वादळ राजनेत्यांची झोप उडवतेय
आमचे एकत्रिकरण सगळ्यांवर भारि पडतेय
आम्ही आहोत धनगर
आमच्या घरि आहेत धनाचे आगर
असा शब्दच्छल ज्याने केला
त्याने जरा स्वताकडे पहावे

कुणाच्या प्रगति आड आम्हाला यायचे नाही
पण आमचा विकासहि आम्हाला थाम्बवायचा नाही




3 comments:

प्रकाश पोळ said...

अर्चनाताई खुपच छान कविता....धनगर समाजाचा संघर्ष आपण ओघवत्या भाषेत मांडला आहे.....keep it up.....

archana sonagre said...

Thankyou for your encouragement

Vinay valkunde said...

खुप छान कविता केली आहे nice