Monday, August 4, 2014

या सरकारच डोक तरी ठिकाणावर आहे का ?


विजय गावडे, अभ्यासक आणि विचारवंत.
------------------------------------
परवा रविवारच्या पूण्यनगरीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ST मध्ये धनगर समाजाचा समावेश अस म्हणत आहेत ?

आहो आमचा समावेश 1950 च्या प्रेसिड़ेंशीअल ऑर्डरने झालेलाच आहे .काका कालेलकर आयोगाने सात क्रमांकचे परीच्छेदात केला आहे .आस आसताना आता तुम्ही पुन्हा कसला समावेश करताय ?

आम्हा धनगर समाजाची मागणी मराठा आरक्षणासारख तातडीन अंमलबजावणी करा ही आहे . अंमलबजावणी बाबत मायबाप सरकारन लेकरा लेकरात दूजाभाव करू नये .
बाबा येड पांघरूण पेडगावला जाऊ नका.
 
पुर्वीचा अशिक्षित धनगर समाज आता राहिली नाहित .मध्य पूर्वेतील होस्नी मुबारक ,कर्नल गद्दाफी यांच्या दुष्ट राजवती ज्या फेसबुक व वाटस अप या सोशल मीडियान कल तोच मिडिया आन्ना हजारे नरेंद्र मोदी यानी वापरला ती जागृतीची हत्यार तरुण धनगर पिढीच्या हातात आहेत हे विसरु नका .

तुमचे सहकारी या सरकारला लकवा मारलाय अस म्हणतात पण कारण तुम्ही निर्णय लवकर घेत नाही पण मी तर म्हणेन या मुलाखतीवरून धनगर समाजाचा प्रश्नच तुम्हाला कळला नाही असे तुम्ही दाखवत आहात .

ST आरक्षणामूळे धनगर समाजास राजकारणात आरक्षण मिळेल .ही तुमची खरी पोटदुखी आहे .माझ ते माझ व तुझ पण माझ या पेशातुन सत्ता व पुन्हा सत्तेतुन पैसा या आधारे सुरु असलेल मुठभर घराण्याच राज्य संपेल ही खरी भीती आहे .
राज्याच्या निर्णय प्रक्रियेत हा उपेक्षित वंचित वर्ग यावा असे तुम्हाला कधीच वाटत नसत हे तुमच्या सेवेत आनेक पिढ्या घालवलेल्या भावंडाना "मिशन बारामती " मूळे आता समजले आहे .दुष्ट दुजाभाव करणारी पेशवाई संपवणारे याच धनगर समाजाचे पूर्वज होते हे बाबा विसरु नका .

भारतीय राज्य घटनेन राज्य चालवाव लागत कुणा पवार पिचड ,पुरखे च्या मर्जींन नाही .त्याना विचारून ठरवू म्हणनारया तुम्हाला कळत नसेल तर क्षणभरही मुख्यमंत्रीपदी बसणेचा आधिकार नाही .

पुन्हा पुन्हा म्हणाव वाटतय राज्य घटनेत ज्याना आरक्षण आहे त्याना ते तस न देणार घटनाद्रोही सरकार हे लकवा भरलेल नसून डोकच ठिकाणावर नसलेल आहे .


हे घ्या आणखी ऐक पिवळ वादळ , नांदेडचा भव्य मोर्चा आशी आनेक वादळाने या मुजोर पक्षपाती राज्य घटनाद्रोही सरकारला आजही जाग येत नाही .
हे आंदोलन ऐकही खडा न मारता हे आंदोलन आजअखेर चालु आहे .
आज हा संताप आनावर होतो की काय असे वाटते .या उग्र संतापा आजुनही सयमी आहे कारण धनगर समाज हे मानतो की प्रत्येक गोष्टीला कधी तरी अंत आहे 
बाबाहो ! हा सयंमाचा बांध फुटू देवू नका .अन्यथा या दुष्ट कपटी राज्यकर्ते यांचा विनाश अटळ आहे

0 comments: