Friday, December 26, 2014

धनगरांची राजकीय उपेक्षा का ?

स्वातंञ्याची 67 वर्षे उलटून गेलीत. परंतू महाराष्टर् राज्यात लोकसंख्येने दिड - दोन कोटी असणा-या  समाजास आजपर्यंत लोकसभा व
राज्यसभा या संसदेच्या एकाही सभागृहाचे तोंड देखील पाहता आलेले नाही.
याशिवाय लज्जास्पद बाब धनगर समाजासाठी व राजकारण करणा-यांसाठी आणखी दुसरी काय असू शकते ?

कविता पोहचली विधिमंडळात

प्रसिद्ध पत्रकार आणि ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांची कविता विधानसभा आणि विधान परिषदेत गाजली. विधानसभेत दिंडोरी पेठ मतदारसंघाचे  आमदार नरहरी झिरवाळ तर विधान परिषदेत आमदार जयंत जाधव यांनी वाचून दाखविली. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील  लाखो शेतकऱ्यांची मुले आणि त्यांच्या कष्टाचा सन्मान भरणार्‍या संवेदनशील नागरिकांनी ही पोस्ट शेअर केली म्हणून विधिमंडळात पोहोचली.

मेला माझा नवरा जरी
मला नका भेटू
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू.

धनगर आरक्षण : भाजपची दुटप्पी भूमिका ?

मिञांनो आज आरक्षण संदर्भात जे विधान परिषदेत झाले ते शब्द फिरवा फिरवी झालीय ! सावरांनी दिलेले ऊत्तर ठरवुन कसलेल्या राजकारण्याप्रमाने  अर्ध सत्य ऊत्तर दिले ! अनुसुचिती जमातीच्या यादित नसल्यामुळे आरक्षण देता येत नाही ! मुळ प्रश्न यादित दुरुस्ती म्हना किंवा ड व र एकच आहेत हे घटणेमधे बिलोग्राफी मधिल चुकिणी सुचित  गृहित धरले नाही म्हणा ! तर मग का करत नाही ? तर हे गोल गोल ऊत्तरं येतील व खडसेंनी सांगितल्याप्रमाणे समीती येईल परंतु खरा प्रश्न अमलबजावणी करायची तर त्यावर कँषिनेट मध्ये चर्चा

😔 चितरकथा आरक्षणाची

ऐकानं म्हणायचं देतो,
दुसर्‍यानं म्हणायचं न्याय्य मागणी नसे,
कसले हे तुमचे दु तोंडी धोरण असे,
गरज लागली की म्हणायचे देतो,
गरज सरली की म्हणायचे धीरधरा,
मध्येच असे पिल्लु सोडायचं,
अन, सतत धनगरांच्या भावनांशी खेळायच.

धनगर समाजाच्या सामाजिक गतिशिलतेतील अडथळे

१)आधुनिक बुध्दीवादी संस्कृती आजही समाज मानायास तयार नाही.

२)फक्त ऐकीव गोष्टी बद्दल प्रचंड विश्वास(कर्ण गोचर ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान अशी समजुत.)

३)विवेक वादी विचार न करता परंपरेप्रमाणे चालत आहे, कोणा बरोबर जेवावे व काय जेवावे,

भाजपने भ्रमात राहू नये

ऐक शाश्वत सत्य ...
आरक्षण मुद्यावर धनगर समाज ऐकवटलूयामुळे भाजपा ने सत्ता स्थापण केली...

➡आ.अटलबिहारी वाजपेयी यांनी पंढरपुर येथिल धनगर समाजाच्या महामेळव्यात घोषणा केली होती
केंद्सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कायदा संमत केला आहे अट ऐकच होती ....

धनगर आरक्षन पोवाडा

फड फड फड फड पिवला फडके गगनात
सर्वांग भरल त्याच न्हाला उभा रक्तात
फड फड नाही त्याची तड फड घ्या र ध्यानात
येड्या कोकरावानी का रे भटकताय रानात
जर का जागा नाही झालात झेंड्याला साथ
दिली नाही ख़ास शिवलेनच राजे जी र मर्दा हो जी रे रेरे
जी जी ।।ध्रु।।

Wednesday, November 12, 2014

Bapu Biru Vategaonkar (बापू बिरू वाटेगावकर)


युवकांनी व्यसनाच्या आहारी जावून अमूूूल्य जीवन बरबाद न करता स्वत:ची शरीर संपदा सांभाळून अन्यायाविरोधात विचाराच्या ताकदीने प्रतिकार केल्यास समाजातील दुष्टप्रवृत्तीचा नायनाट होईल.
- बापू बिरू वाटेगावकर (फलटण, दि.१३ जून २०११) 

Sunday, November 9, 2014

महाकवी कालिदास 'धनगर' होने के सबूत


अनेक वेबसाईट तथा ब्लॉगपर धनगर महापुरषोंकी सूचि में महाकवी कालिदासजी का नाम पाया जाता है। लेकिन उसीके लिखित सबूत उपलब्ध कराने के संदर्भ में मुझे कुछ संदेश आए थे। महाकवी कालिदास 'धनगर' होने के कुछ लिखित तथा दूसरे सबूत निचे दे रहा हूँ। 

००१. 'Encyclopaedia of Scheduled Tribes in India: In Five Volume' (English) By P.K. Mohanty (Page No-84)

००२. 'Martial races of undivided India' (English) By Vidya Prakash Tyagi (Page No-205)

००३. 'Home, Again' (English Novel) By Dr. Ulhas R. Gunjal (Page No-146)

००४. 'Socio-Economic Issues of ‘Dhangar’ Nomadic Communities in Maharashtra' (English Journal) By S.M. Kamble

इन चार सबूतोंके अलावा महाकवी कालिदासजी के जीवनपर आधारित कुछ चित्रपटों में भी उन्हें धनगर ही दिखाया गया है। 

००१. 'महाकवी कालिदास' (कन्नड) १९५५

००२. 'महाकवी कालीदासू' (तेलगू) १९६०

००३. 'कवीरत्न कालिदास' (कन्नड) १९८३

अभीभी महाकवी कालिदासजी के जीवन की इतर अनेक जानकारी में इतिहासकारों में विवाद है। महाकवी कालिदासजी के जीवनपर अधिक संशोधन होने की जरुरत है। 

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

Friday, November 7, 2014

The Great Saint-Poet Kanakadasa


भारत ही साधू-संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. सर्वच धर्माच्या अनेक साधू संतांनी आपापल्या काळात समाज प्रबोधनाचे कार्य मोठया प्रमाणावर केले. त्यांनी लिहून ठेवलेले साहित्यग्रंथ आजही त्याची प्रचीती देतात. कर्नाटकातील अशाच एका महान संताचा हा संक्षिप्त जीवन आढावा… 

संत कनकदास : एक संत, कवी, तत्वेत्ते तसेच रचनाकार म्हणून त्यांची ओळख अवघ्या देशाला आहे. संत कनकदासांचा जन्म सध्याच्या कर्नाटक राज्यातील बाड (ता-शिवार, जि-हावेरी) येथे १५०९ साली एका कुरुबा (धनगर) कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिराप्पा तर आईचे नाव बचम्मा होय. संत कनकदासांचे मूळ नाव हे थिमाप्पा होते. तरुणपणात थिमाप्पांना एक खजिना मिळाला होता,त्याचा त्यांनी स्वतःसाठी उपयोग न करता समाजकार्यासाठी तो देऊ केला. त्याचमुळे थिमाप्पा यांना कनकदास (कनक-सुवर्ण) या नावानी ओळखले जाऊ लागले.

त्यांचे समाजीक एकात्मतेचे कार्य हे खरंच सर्वांना अजूनही प्रेरणादायी असेच आहे. संत कनकदासांनी आपल्या जीवन काळात अनेक कीर्तने, सामाजिक-धार्मिक गीते तसेच रचना रचल्या. त्यातील नलचरीत्र, हरीभक्तीसार, नृसिंहस्तव, रामधन्यचरीत्र आणि मोहनतरंगिनी या त्यांच्या प्रमुख रचना मानल्या जातात. या व्यतिरिक्तही त्यांनी शेकडो कीर्तने तसेच सामाजिक-धार्मिक गीते रचली व समाजीक एकात्मतेसाठीच जीवन अर्पिले.

​सदैव लोककल्याणाचा विचार करणाऱ्या संत कनकदासांनी तिरुपती येथे जीवनातील शेवटचे दिवस घालवले. १६०९ मध्ये ह्या महान संताचा, कवीचा, तत्वेत्याचा तसेच एका महान रचनाकाराचा मृत्यू झाला. त्यांचा शारीरिक मृत्यू झाला असला तरीही संत कनकदासांचे वैचारिक रूप आजही जनमाणसांत जिवंतच आहे. 

चित्रपट सृष्टीलाही संत कनकदासांच्या विचारांची ओढ लागली नाही असे नाही. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या अभिनयाने नटलेला 'भक्त कनकदास' हा १९६० सालचा कन्नड चित्रपट त्या काळात अतिशय लोकप्रिय ठरला. तसेच अनेक गीते व नाटके यातून आजही संत कनकदासांचे कार्य समाजापुढे आणन्याचा प्रयत्न सुरूच असतो.

त्याचबरोबर संत कनकदासांच्या कार्याचा एक सन्मान म्हणून कर्नाटक राज्य सरकारने 'कनकदास जयंती' रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तसेच त्या दिवशी संपूर्ण राज्यभर सर्वच छोटया-मोठया गावात-शहरांत विविध कार्यक्रमांचे तसेच मिरवणूकींचे आयोजन केले जाते व संत कनकदासांच्या विचारांचा जागर मांडला जातो. 

अशा एका थोर संताच्या विचारांचा उपयोग राज्याच्या अथवा भाषेच्या सीमा न घालता सर्व समाजांच्या प्रबोधनासाठी केला जावा हीच अपेक्षा…!

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

Thursday, November 6, 2014

Maharaja Yashwant Rao Holkar

H.H. Maharajadhiraj Raj-Rajeshwar Sawai Shrimant Yashwant Rao Holkar 
(Born - 03 December 1776, Coronation - 06 January 1799, Died - 28 October 1811)

Wednesday, October 1, 2014

कविता - वीरांगना भीमाबाई

भारतभूमी अजुनी गाती, शौर्यगीत या वीरांगनेचे
मर्दानी लढली इंग्रजांसवे, रक्षिण्या स्वातंत्र्य देशाचे

शोभे माता लाडाबाई, पिता महाराजा यशवंत
पण कैदेतल्या बालपणाचे, आले नशिबी दुर्भाग्य

महाराजांनी, विजयी करुनी, हडपसरचे युद्ध
मुक्त केले, जुलमी जाचातूनी, कुटुंब-कबिल्यास

सुटता पुण्यातील कैदेतूनी, सुरुवात झाली शिक्षणास
तलवारबाजी घोडेस्वारी सारख्या, लष्करी प्रशिक्षणास

होता उपवर भिमाई, आनंदे संपन्न झाला विवाह
पती लाभले, सरदार बुळे घराण्यातील, गोविंदराव

नियतीने योजिला होता, एक नवा वेगळाच डाव
विवाहाच्या फक्त दोनच वर्षांत, माथी आले वैधव्य

पण दु:खाने हताश होईल ती, 'यशवंत-कन्या' कैसी ?
दु:ख सारुनी येउनी मिळे, पित्याच्या स्वातंत्र्य कार्यासी

देखी तोफांचे कारखाने, होळकरी सैन्याची भरती
अश्व-निवडींवर देखील चाले, नियंत्रण भीमाबाई

सरता थोडा काळ, झाला आणखी एक आघात
हरवले पितृछत्र, महाराजा यशवंत स्वर्गवास

संधी साधून मोक्याची, गोरे फिरंगी प्रयत्न करीती
तरीही जिंकणे अशक्य होती, इंदुरची होळकरशाही

फिरंग्यांनी साधुनी कुटनीती, फोडले अनेक सेनानी
खून तुळसाबाईंचा करुनी, दिले प्रेत नदीत टाकुनी

काही वर्षांतच तोंड फुटले, महिद्पुरच्या युद्धाला
पण त्यातही फितुरीचे काटे नडले, होळकरी सैन्याला

युद्धात महिद्पुरच्या, होळकरांनी केली शौर्याची बरसात
पण फितूर झालेल्या गफूरखानाने, रण सोडले ऐन जंगेत

विजय कमळ हातूनी निसटले, झाला तह इंग्रजासंगे
पण भीमाबाई तेथून निसटे, तीन हजार पेंढारी संगे

सदा राहुनी अरण्यवासी, गनिमीकावा मंत्र जपे
फिरंगी भयभीत असती, भीमाबाई करी गनिमी-हल्ले

फिरंग्यांचे खजिने लुटले, केली उध्वस्त अनेक तळे
हल्ले असती अति रांगडे, माल्कमही पळून जाये

पाठवी पत्रे सर्व राजांना, विनंती असे एकत्र लढयाची
प्रतिसाद नसे कोणाचा, तरी चालू ठेविला एकाकी लढा

माल्कमने टाकला मग नवा डाव, केला फितूर रोशनखान
धार नजीक असता तळ, केझरने केला हल्ला तत्काळ

हल्ला झाला चोहोबाजूंनी, पडली एकाकी ही वीरांगना
अखेर झाली कैद, करुनी ठेविले रामपुरा गढीत बंधिस्त

दुर्भाग्य जणू ह्या वीरांगनेचे, मृत्यूही आला कैदेत
विसावला भीमाबाई नावाचा, स्वातंत्र्यासाठीचा झंझावात

ठेऊनी जान त्या कर्तुत्वाची, घ्यावे राष्ट्रकार्य भीमाईचे समजुनी
नमोनि विंनती करे मिलिंद, सर्वांच्या चरणी ! सर्वांच्या चरणी !!

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

Thursday, September 11, 2014

घोळ धनगर, धनगड, धांगड चा....

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत असूनही शासन या मुद्द्यावर अक्षम्य उदासीनता दाखवत आहे. धनगर समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी शासनाने त्वरीत करावी म्हणून दोन महिने जोरदार आंदोलन छेडले. परंतु झोपेचे सोंग घेतलेले सरकार आणि संबंधित यंत्रणा धनगर समाजाला घटनात्मक सवलतींपासून वंचित ठेवण्याचे पातक करीत आहेत. धनगर आरक्षणाबाबत अनुसूचित जमाती मंत्रालयाला माहितीच्या अधिकाराखाली काही प्रश्न विचारले. धनगर समाजाचा समावेश महाराष्ट्रात अनुसूचित जमातीत आहे का असे विचारले असता,

Tuesday, September 9, 2014

धनगरांचा इतिहास गौरवशाली; भवितव्य अंधारात

दैनिक नवशक्ती, ऐसी अक्षरे रसिके या पुरवणीतून साभार.
धनगर समाज आजमितीला बावीस पोटजातींत वाटला गेलेला आहे. या पोटजातींत अजूनही नीट समन्वयही नाही. आजची तरुण शिक्षित पिढी धनगर सारा एक असा नारा देत असली आणि त्या दिशेने प्रयत्न होत असले तरी ते पुरेसे नाहीत. प्रत्येक पोटजातीची स्वतंत्र संघटना आहे. वधुवर मेळाव्यांपलीकडे त्यांची मजल जात नाही.

महादेव जानकर ! एक खडतर, तरीही “यशस्वी” प्रवास

माणूस कोठे पोहोचला, या पेक्षा तो कोठुन कोठे पोहोचला यावरून त्याला यशस्वी ठरविले पाहिजे, असे कोण्या एका विचारवंताने म्हटले आहे. राजाचा मुलगा जन्मताच राजपुत्र बनतो., नंतर तो राजा बनतो. एखादा दिल्लीस एका तासात पोहोचतो कारण तो जवळच आग्र्याला रहात असतो. परंतु दूर दक्षिणेत, सातार्याच्या रानमाळावर जन्म घेणारा जेंव्हा दिल्लीची वाट चालू लागतो, तेव्हा तो दिल्लीत पोहोचला की नाही या पेक्षा आता तो कोठे पोहोचला, यावरून त्याच्या यश-अपयशाचे मोजमाप केले जावे. वरील विचारवंताच्या म्हणण्याचा तोच मतितार्थ आहे.

Thursday, September 4, 2014

चल उठ आणि लढायला सुरुवात कर...!

आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरुन बऱयाच मोठ्या प्रमाणात राजकीय गोंधळ चालु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, असा समज झालेले आ. विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस साथ सोडुन महायुतीशी हात मिळवणी केली व पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणी वर आला. त्यामुऴे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला घोषणापत्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा घ्यावा लागला. पण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजापेक्षा अत्यन्त बिकट स्थिती असणारे अनेक समाज अस्तित्वात

धनगर आंदोलनाची दिशा

घटनात्मक हक्काची जाणीव झाल्यापासून साधारणपणे 1969 पासून धनगरांच्या आरक्षण हक्काचा लढा सुरू आहे. त्याला तिव्रता आली 1988-89 पासुन त्या वेळी धुरंधर शासनकर्ता ने घटनाबाह्य रित्या धनगर समाज एन टी आरक्षण दिले आजच्या सारखे च आंदोलन पेटले होते धनगरांतील काही कार्यकर्ते यांना पुर्ण घटनात्मक अभ्यास नव्हता तेव्हा धुरंधर नात्यांनी ती चळवळ पध्दतशीरपणे थोपवली.

धनगरांच्या कुंडलीतला "ड"!

धनगर समाजाला आपला हक्क मिळायलाच हवा
-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं

प्रश्न कुजवत ठेवण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. गेल्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी याची अनेक उदाहरणे घालून दिली आहेत. मराठा आरक्षण हे त्यातीलच एक उदाहरण. मोठा झटका बसल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षण मार्गी लावले. हे करताना त्यांनी मुस्लिम आरक्षणाचे घोडे मध्ये दामटवलेच. (आता ही दोन्ही आरक्षणे कोर्टात टिकतात किंवा कसे याबाबत खात्री नाही.) मराठा आरक्षणाच्याही

Wednesday, September 3, 2014

राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाचे राजकारण

एखाद्या इमानदार जमातीला चोर संबोधने किंवा रक्ताची गंगा वाहली तरी चालेल पण एखाद्या अत्यंत मागास असणाऱ्या समाजाला आरक्षन मिळु देणार नाही, अश्या प्रकारची वक्तव्य राज्य शासनाच्या महत्वाच्या पदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याने करणे हे कितपत योग्य आहे?  हा एक जनसामान्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु असाच काही प्रकार साधुसंताच्या चरणांच्या

धनगर समाजाचे मूळ- भाग 1

अलिकडे धनगर समाजातीलच स्वयंघोषित काही संशोधक, विदवान, विचारवंत व साहित्यिक म्हणवून घेणारे महाभाग धनगर समाजाचे मूळ कोणी आर्यात ,तर
कोणी क्षञियात , तर कोणी राजपुतात,तर कोणी ब्राम्हणात शोधून समाजात तसा भ्रम पसरविण्याचे कार्ये करतांना पाहून प्रचंड क्लेष होतो.

Saturday, August 30, 2014

रानकवी - यशवंत तांदळे

महाराष्ट्रातील विस्मृतीत गेलेले एक प्रतिभावंत साहित्यिक, रानकवी - यशवंत तांदळे यांच्याविषयी माहिती देणारा श्री. रघुराज मेटकरी लिखित लेख : 

पृथ्वीमातेला पडलेले एक निरागस स्वप्न म्हणजे रानकवी यशवंत तांदळे. १९७६ साली ५१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कराड येथे भरलेले होते. या संमेलनात सहभागी व्हायला अनेक साहित्यिक जमलेले. या झकपक साहित्यिकांच्या गर्दीत मळकट धोतर, मळकट पांढरा शर्ट व लाल भडक मुंडासे आणि खांदयावर घोंगडे अशा अवस्थेत एक अडाणी धनगर व्यासपीठाजवळ आला. आणि "मला एक कुंडका म्हणू दया" अशा विनंत्या करू लागला. पण त्याच्याकडे लक्ष देते कोण ? संयोजक, निवेदक आपापल्या नादात गर्क. ​पण समोर

Friday, August 29, 2014

होमेश भुजाडे यांचे मुख्यमंञ्यांना खुले पत्र - 2


मान . पृथ्विराज चव्हाणजी , अनूसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी आंदोलनाच्या अनूषंगाने धनगरांसोबत आपण कूटनीतीपूर्ण जी खेळी खेळली त्या बद्दल आपला व आपल्या सरकार मधील आघाडी दलांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच. 

खेळी क्र.१) तिस-या सूचिची शिफारस 
उत्तर : ज्याची मागणीच धनगर समाजाने केलेली नाही . त्या तिस-या सूचिचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याची भाषा आपल्यासारख्या मुख्यमंञ्यांनी करणे ही अत्यंत खेद जनक बाब आहे. आपली ही कृती ज्या गावाला जायचेच त्या गावचे तिकीट

होमेश भुजाडे यांचे मुख्यमंञ्यांना खुले पत्र-1

पृथ्वीराज चव्हाण

प्रति,

मान. मुख्यमंत्री,
पृथ्वीराज चव्हाण साहेब,
मुंबई (महाराष्ट्र राज्य).

प्रिय महोदय ,

आपणास होमेश भुजाडे यांचा जय अहिल्याई ! जय मल्हार !! वि. वि.

गेल्या दीड - दोन महिन्यापासून धनगर जमातीचे अनूसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने योग्य ते सर्व पूरावे आपल्या सुपूर्द करण्यात आलेत . तरी सुद्धा आपण

धनगर जमातीकडून शासनाची भ्रष्टाचारातून झिजीया कराची वसूली


आदिवासी मेंढपाळ धनगर जमातीकडून शासनाची भ्रष्टाचारातून झिजीया कराची वसूली

पावसाळयात खरीप पिकांची पेरणी सूरू होते.  त्यामूळे सर्व शेत जमिनी पिकांनी व्यापलेल्या असतात.  जून ते नोव्हेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत धनगरांपूढे शेळ्या - मेंढ्या चराईचा भीषण प्रश्न भेडसावत असतो.

Wednesday, August 27, 2014

धनगर सरदार देवकाते

सुभेदार बळवंतराव देवकाते :

सरदार जिवाजी राजे देवकाते हा विजापूर दरबारातील एक मातब्बर सरदार. विजापूरच्या पातशाहाकडून वंशपरंपरेने जहागीर, मनसब, इनामे व वतने घेऊन सेवाचाकरी करत होता. पहिल्या शाहूने देवकाते यांना दिलेल्या वतनपञातील नोंदीनुसार विजापूरकरांकडून कर्यात बारामती प्रांत सुपे येथील २२ गावांची सरपाटीलकी तर ०६ गावांची पाटीलकी त्यास वंशपरंपरेने मिळाली होती. तसेच मौजे कन्हेरी हा गाव

Wednesday, August 20, 2014

धनगर आरक्षण - महाराष्ट्र टाईम्समधील लेखावर प्रतिक्रिया

19 ऑगष्ट च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये समीर मणियार यांचा 'राखीव जागांचा येळकोट' हा लेख वाचला. सदर लेखात धनगर आरक्षणाबाबत चूकीची मांडणी केली आहे. त्यामुळे धनगरांच्या आरक्षण मागणीबद्दल गैरसमज पसरु शकतात. त्यामुळे ही दुसरी बाजू प्रसिद्ध करावी ही विनंती.

केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या मूळ यादीत महाराष्ट्रात 47 जमातींची नोंद आहे. (यातील दोन जमाती नंतर वगळण्यात आल्या आहेत) यात अनु. 36 वर oran, dhangad अशी नोंद आहे. यातील dhangad चा उच्चार धनगड, धांगड, धंगाद असा विविध प्रकारे होत असल्यामुळे सर्वांचाच गोंधळ झाला

Monday, August 18, 2014

धनगर आंदोलनातील हिंसा आणि त्याची प्रतिक्रिया


धनगर समाजाचे 14 ऑगष्ट रोजीचे महाराष्ट्रव्यापी आंदोलन खूप यशस्वी झाले. संपूर्ण राज्यात हे आंदोलन शांततेत पार पडत असताना बारामती, सातारा आणि फलटण या ठिकाणी काही हिंसक घटना घडल्या. बारामती आणि फलटण येथे काही एस. टी. गाड्यांची तोडफोड झाली तर सातारा येथे राष्ट्रवादीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर एका कार्यकर्त्याने अबिर-बुक्का टाकला. राज्यभर इतर ठिकाणी मात्र आंदोलन शांततेत पार पडले. वास्तविक पहाता कोणतेही आंदोलन लोकशाही मार्गाने आणि घटनेच्या चौकटीत राहूनच करायला पाहिजे. परंतू विविध

Sunday, August 17, 2014

मा. शरद पवार ( राष्ट्रिय अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी ) यांना पत्र


शरद पवार
माननीय शरद्चंद्रजी पवार यांना होमेश भुजाडे यांचा सप्रेम जय मल्हार वि. वि.


अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून धनगर समाजाचे महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन प्रचंड ताकदिनीशी सुरू आहे.
धनगड - धनगर एकच असून त्यांना संविधानाप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी अनेकदा आंदोलनं झालित. ही मागणी काही नविन नाही. धनगर जमातीवर गेली ६४ वर्षे झालेला अन्याय व या जमातीचे एवढी वर्षे झालेले सर्वांगिण नूकसान भरून न निघणारे आहे.

Saturday, August 16, 2014

शरद पवार साहेब आता तरी खरे बोलताय का ?

शरद पवार
शरद पवारसाहेब धनगर ST आरक्षणावर आपण इतक्या उशिरा तोंड उघडलत आता खर सांगा >>>>>

आपण धनगर समाजाचे आदिवासीत्व कबूल केलत मग ST आरक्षणाची आपण इतकी वर्षे प्रमाणपत्र का दिल नाहित ?

हिंदितला धनगड शब्द कोणी मराठीमध्ये जाणीवपूर्वक धनगर असा भाषांतरीत केला नाही .तुमचा इमानी धनगर मतदार बांधव तुम्ही 1956 पासून विकासाच्या आदिवासी हक्कापासून वंचित उपेक्षित का ठेव़ू दिलात ?
आपण त्यांचे खरे लोकप्रतिनिधी नव्हता हे खर समजायच का?

आम्ही धनगर

लाजत बुजत जगत आलोय आम्ही
मुळ प्रवाहापासुन दुर राहलो आम्ही
रानोवनी भटकंति आमची जिवन गाणी
मेढपाळ म्हनुन सर्वान्ना ओळख आमची
येळकोट येळकोट गर्जना आमची
खंडोबाच्या चरणी श्रद्धा आमची

Friday, August 15, 2014

यांच्या स्वातंत्र्याचं काय ?

15 ऑगष्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीशानी जखडलेल्या गुलामीच्या बेड्या आपण तोडल्या. दरवर्षी 15 ऑगष्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हा आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे हे मान्यच....परंतु हे स्वातंत्र्य खरोखर समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचलय का याचा विचार समस्त भारतीयानी करावा असे मला वाटते. आजही अनेक लोकाना रहायला निवारा नाही, अनेकाना गाव नाहे, या देशाचे नागरिक असल्याची त्यांची कोणतीही ओळख नाही. या गावकुसाबाहेरच्या,

Thursday, August 14, 2014

स्वातंत्र्य

किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला

तरुणान्नि तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले

पिवळे वादळ झेपावले…


१३ ऑगष्ट : महाराणी अहिल्यादेवी होळकर स्मृतीदिन !

१३ ऑगष्ट १७९५ : जागतिक इतिहासात उत्कृष्ट प्रशासिका म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी ! पुण्यतिथी दिनानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन !

Sunday, August 10, 2014

महाराष्ट्रातील धनगरांच्या राजकीय अस्मितेचा खून कोणी केला ?

अजित पवार 
गेली दिड महिने लोकशाही मार्गानेच धनगरांचे ST आरक्षण अम्मलबजावणी करण्यासंबंधीचे आंदोलन सुरू आहे. काही तुरळक प्रकार सोडले तर हे आंदोलन अत्यंत संयमाने ,शांततेने व अहिंसक मार्गानेच सूरू आहे. या आंदोलनाचा कोणीही पूढारी नाही.गाव, जिल्हा, तालूका व शहरी स्तरावर सुरू असलेले हे आंदोलन त्या त्या भागातील तरूण व वृद्धांनी स्वयंस्पृर्तीने सुरू केलेले आहे. आंदोलना संबधी कोणत्यातरी पुढा-यांनी त्यांना सांगितले म्हणून केले असे मूळीच नाही. म्हणूनच हे जन आंदोलन ठरलेले आहे. नेत्यांच्या पुढाकाराशिवाय आंदोलन होऊच शकत नाही हा आतापर्यंतचा समज धनगरांच्या या आंदोलनाने खोटा ठरविलेला आहे.

Saturday, August 9, 2014

धनगरानो षडयंत्र वेळीच ओळखा...

आजपर्यंत बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर जिल्हा, सांगली, नगर या पट्ट्यातील लोकानी पिढ्यानपिढ्या धनगर समाजाला ग्रुहित धरुन राजकारण केले. आज समाजाला जाणीव झाली कि हे राज्यकर्ते आपला वापर करुन घेताहेत. त्यातच आरक्षण प्रश्नावर सरकारने चालवली दिरंगाई ही धनगर समाजाच्या असंतोषात भर घालणारी ठरली. हा सरकारविरोधातला असंतोष आणि महादेव जानकर यांची महायुतीशी हातमिळवणी यामुळे हा समाज महायुतीकडे झुकला.

धनगरांचा ओढा महायुतीकडेच का ?

गेली पासष्ट वर्षे धनगर समाज आरक्षणाची मागणी करतोय. त्यांचा प्रश्न समजून न घेता राज्यकर्त्यानी धनगरांची क्रूर चेष्टा केली. केंद्रात आणि राज्यात अपवाद वगळता कोंग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. त्यांच्या नेत्याना भेटून धनगर समाज आपली आरक्षणाची मागणी पटवून देतोय. परंतू झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य सरकारला धनगरांचा प्रश्न सोडवण्याची इच्छा नाही. राजीव गांधींपासून ते शरद पवारांपर्यंत सर्व लोकाना धनगरांची मागणी योग्य आहे हे माहित आहे. परंतू फक्त आश्वासन देण्यापलीकडे या नेत्यांकडून काहीच झाले नाही. 

हर्षवर्धन पाटलांवर शाई आणि अजितदादांची घाई

अजित पवार
धनगर आरक्षणाचे आंदोलन ऐन भरात असताना हर्षवर्धन पाटलांवर शाई फेकण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. आरक्षण क्रुती समीती आणि सर्व समाजाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. कोणतीही मागणी लोकशाही प्रक्रियेच्या चौकटीत राहूनच करावी. त्यासाठी अर्ज-विनंत्या, मोर्चे, सभा हे मार्ग आहेतच. सरकारी, सामाजिक मालमत्तेचे नुकसान करणे, एखाद्या व्यक्तीला इजा पोहचवणे अशा प्रकारचे आंदोलन चुकीचे आहे. त्यामुळे सदर घटनेचा निषेध केलाच पाहिजे.

Friday, August 8, 2014

कविता - निर्भय आझाद

धनगरवाडा-महारवाडा 
सख्खे शेजारी 
समदुःखी बंधुत्वाचा निष्कर्ष 
बोधिसत्व बापाचा… 
कलमच हत्यार 
कलमांच्या तरतूदींची पाचर 
सत्ता, संपत्ती, सन्मानासहित 

Wednesday, August 6, 2014

धनगराना आरक्षण नाकारणे हा राज्यघटनेशी द्रोह

6 ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये सुशिम कांबळे यांचे धनगर आरक्षणाविषयी पत्र वाचले. अनुसूचित जमातीत समावेश असणार्या धनगरसद्रुश्य जमातींची यादी देवुन यात धनगर किंवा धनगड या शब्दांचा उल्लेख नाही असे ते म्हणतात. याबाबत अनु. जमाती मंत्रालयाच्या 2008-09 च्या वार्षिक अहवालातील अनु. जमातीची इंग्रजी यादी पाहू. छत्तीसगढ-(33) oran, dhanka, dhangad, गुजरात-(24) rabari, हिमाचलप्रदेश-(2) gaddi,

Tuesday, August 5, 2014

शिंगरुबा : कथा एका धनगरी वादळाची

शिंगरुबा  मंदिर

मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा “रस्ता’ कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा! धनगरांची स्वत:ची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा

Monday, August 4, 2014

मुख्यमंत्री धनगर समाजाची दिशाभूल करताहेत

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा टोलवाटोलवी केली...
कृपया पुर्ण वाचा... महत्वाचे... 
राज्य सरकारचा यात रोल काय???
धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करण्यात राज्य सरकारची भूमिका काय आहे??
ST प्रवर्गात समावेश करण्यासाठी काय काय लागते?? 
केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवायचे काम राज्य सरकारचे आहे, मगच पुढील कार्यवाही सुरू होते...

मी ईंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत लिहीत आहे... 
कृपया पुर्ण वाचा...

या सरकारच डोक तरी ठिकाणावर आहे का ?


विजय गावडे, अभ्यासक आणि विचारवंत.
------------------------------------
परवा रविवारच्या पूण्यनगरीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ST मध्ये धनगर समाजाचा समावेश अस म्हणत आहेत ?

आहो आमचा समावेश 1950 च्या प्रेसिड़ेंशीअल ऑर्डरने झालेलाच आहे .काका कालेलकर आयोगाने सात क्रमांकचे परीच्छेदात केला आहे .आस आसताना आता तुम्ही पुन्हा कसला समावेश करताय ?

धनगर बांधवांसाठी अतिशय महत्वाची सुचना


निर्लज्ज सरकार तिसरी सुची आपले धनगरांचे माथ्यावर मारण्याच्या पुर्ण तयारीमधे कामे चालु आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले धनगर आरक्षण एस.टी.चे आहे आणी एस.टी.चेच आरक्षण आमला घ्यायचे आहे!
35 जिल्हयाचे प्रतिनीधी हजारोंच्या संख्येने मुंबई मध्ये 5 आँगस्ट रोजी सकाळी10-30 वाजता आझाद मैदान मुंबई येथे पोहचत आहेत.

Sunday, August 3, 2014

पुरके, मोघे, पिचड, वळवी हे घ्या पुरावे - भाग 3


१०) छतिसगढ राज्य अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री तारासिंह राठीया यांनी २००७ रोजी छतिसगढचे मुख्यमंत्री डॉ. रमनसिंहजी यांना लिहीलेल्या शिफारस पत्रात म्हटले आहे की भारतीय संविधान अनुच्छेद ३४२ नुसार अनुसूचित जमातिच्या यादित अनुक्रमांक ३३ वर धनगड, धनकर, धानका लिहिलेले आहे. तसेच अन्यमागासवर्गियांच्या यादित अनुक्रमांक २५ वर गडरिया, धनगर जातिचा उल्लेख आहे. या सर्व जाती एकच असून छतिसगढ राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या अधिनियम १९९५ कलम ९, पोटकलम १ (ख) अंतर्गत

Saturday, August 2, 2014

धनगर आरक्षण लेखावर साप्ताहिक चित्रलेखाला पत्र

मा. संपादक,
साप्ताहिक चित्रलेखा.

महोदय,

11 ऑगस्ट 2014 च्या चित्रलेखा मध्ये संपादक द्न्यानेश महाराव यांचा 'धनगर-आदिवासी आरक्षणाची बारामती' हा लेख वाचला. सदर लेख एकांगी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा वाटला म्हणून हा लेखनप्रपंच....या लेखात महाराव यानी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

1. महादेव जानकर याना आपणच धनगर समाजाचे एकमेव व ताकदवान नेते आहोत असे वाटते. त्याना बारामती लोकसभेला मिळालेली मतं ही मोदींच्या लाटेमुळे मिळाली आहेत.
--महादेव जानकर हे धनगर समाजाचे महत्वाचे नेते आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रात जानकर यांच्याव्यतिरिक्त धनगर समाजाचा एकही सर्वमान्य नेता नाही. जानकर यांची ताकद भलेही कमी असेल, परंतु संपूर्ण राज्यात त्याना मानणारा वर्ग आहे. धनगर आणि मागास बहुजन समाजाला बरोबर घेवुन जाणारा हा नेता आहे.

Friday, August 1, 2014

धनगरांच्या व्यथाना कवितेतुन वाट....निर्भय आझाद

आदिम परोपकाराची निशाणी- 
मेंढरं…! 
करतच राहिली 
आपल्या पवित्र खतामुताने 
पाटलाचं वावर पावन…! 
… 
मस्तवाल सरंजामशाहीची 
अनौरस औलाद- 
पाटील…! 
उलटतच राहिला भरल्या पोटाने…! 
गाभडतच राहिली समता 
वांझपणाचा भोग मिरवत…! 
… 

Thursday, July 31, 2014

पुरके, मोघे, पिचड, वळवी हे घ्या पुरावे - भाग - 2

होमेश भुजाडे
-----------------------------------------------------------
६) GOVERNMENT OF INDIA REPORT OF THE Bakward Classes Commission Vol. ll ( lists) 1955 या शासनाच्या पुस्तकात अतिशय मागास म्हणून ' धनगर ' जमातीचा उल्लेख पृष्ठ क्र. ६६ वर करण्यात आलेला आहे. मग आजपर्यंत या मागास जमातीची शासनानने दखल का घेतली नाही ? शब्दछल करून ST च्या सवलतीपासून दूर का का ठेवले ?
७) DESCRIPTIVE ETHNOLOGY OF BENGAL - 1872 च्या या पस्तकात पृष्ठ क्रमांक २१५ वर ' ओरान ' या जमाती बद्दल माहिती दिलेली असून ती ' धनगर ' या जमातीची समकक्ष असणारी आणि या दोंन्ही जमाती डोंगर, द-या, खो-यात राहून पशुपालन करणारी जमात असल्याचे स्पष्टपणे नमुद केलेले

धनगरांच्या आरक्षणाला घटनात्मक यंत्रणांचा आधार

सध्या धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण मागणीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. धनगरांना अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा म्हणून या समाजाने तीव्र आंदोलन छेडले आहे. दुसरीकडे धनगरांच्या या मागणीला विरोध करत आदिवासी समाजही रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वबुमीवर एकूणच धनगर समाजाची आरक्षण मागणी आणि त्याबाबत असणार्या घटनात्मक तरतुदी याचा उहापोह करणे गरजेचे ठरते.

कोणत्याही समाजाला आदिवासी ठरवण्यासाठी काही निकष विचारात घेतले जातात.
१. आदिम अस्तित्व- धनगर ही आदिम जमात आहे हे इंथोवेन, रसेल, इरावती कर्वे, रा. चि. ढेरे आदी मानववंश शास्त्रज्ञ/ समाजशास्त्रज्ञानी सिद्ध करून दाखवले आहे. अगदी आर्यपूर्व काळापासून हा समाज मेंढपाळीचा निमभटका व्यवसाय करत आहे. महाभारत काळापासूनचे धनगर समाजाचे अस्तित्व अनेकांनी सिद्ध करून दाखवले आहे. आजही धनगर समाज हाच व्यवसाय करतो.

Tuesday, July 29, 2014

पुरके -मोघे -पिचड -वळवी हे घ्या पुरावे

Prof. Homesh Bhujade

Homesh Bhujade, Writer & Social activists.

१) पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष काकासाहेब कालेलकर यांच्या अहवालानुसार धनगड व धनगर एकच असल्याचे नोंदवलेले आहे. धनगर हे अतिमागास असून त्यांना आदिवासीच संबोधलेले आहे.
केंद्र सरकारने OBC करिता जरी हा आयोग स्विकारलेला नसला तरी SC व ST च्या अनुषंगाने सुचवलेल्या शिफारशी व दुरूस्त्या मात्र स्विकारलेल्या आहेत. मग धनगरांना ST चे आरक्षण का नाकारले जाते ?

२) केद्र सरकारने डी. पी मंडल आयोग देशातील मागास जाती जमातीची पाहणी करण्यासाठी नेमलेला होता. त्या आयोगाने महाराष्ट्रातील सर्व भागात दौरे करून धनगर जमातीची पाहणी केली. तेव्हा त्यांनी 'धनगर ' व 'धनगड' या दोंन्ही जमाती वेगवेगळ्या नसून एकच असल्याचे अहवालात नोंदवलेले आहे.
या संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेत चिमणराव कदम यांनी वरिल विषयाच्या अनुषंगाने ८ एप्रील १९८२ रोजी सभागृहात प्रश्न सुद्धा उपस्थीत केलेला होता. 

धनगर आरक्षणाची मागणी घटनात्मक

सध्या धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी या समाजाने मोठे आंदोलन छेडले आहे. धनगरांचा st प्रवर्गात समावेश करण्यास आदिवासी नेत्यांचा विरोध आहे. धनगर हे आदिवासी नाहीत आणि st प्रवर्गातील धनगड जमातीशी धनगरांचा काही संबंध नसल्याचा दावा त्यानी केला आहे. मुळात रसेल, बेंथोवेन, गुंथन सोंथायमर, इरावती कर्वे या मानववंशशास्त्रद्न्य/समाजशास्त्रद्न्य यानी सप्रमाण दाखवुन दिले आहे कि धनगर हे आदिवासीच आहेत. धनगराना आदिवासींप्रमाणे स्वत:ची अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्क्रुती आहे. डोक्याला पागोटे, अंगात बंडी, लंगोट असा धनगरांचा पारंपरिक वेष आहे. धनगरांचे गजी न्रुत्य, ढोल, कैताळ, धनगरी ओवी अशी स्वतंत्र

Monday, July 28, 2014

संजय सोनवणी यांचे मुख्यमंत्र्याना पत्र

संजय सोनवणी 

धनगर, कोळी, आगरी, वडार, गाडीलोहार, हलबा कोष्टी, गोवारी इ. समाजांना न्याय द्यावा यासाठी आजपासून उपोषण सुरू. खालील पत्र मी मुख्यमंत्री व पंतप्रधान तसेच अन्य ठिकाणी पाठवीत आहे. आधीच्या दोन पिढ्या ज्यांनी कोणत्याही गटात आरक्षणाचा लाभ घेतला आहे त्यांना आरक्षणासाठी अपात्र ठरवावे तरच सर्व ख-या वंचितांपर्यंत आरक्षण पोहोचून आरक्षणाचा घटनाकारांचा उद्देश्य सफल होईल ही महत्वाची मागणी आहे.

मी छोटा माणूस आहे. सरकारने माझे ऐकावे असले काही माझे वजन नाही. पण यामुळे अधिकाधिक प्रमाणात समाज जागृती व्हायला मदत होईल अशी मला आशा आहे.

सर्वांच्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

आदिवासी नेत्यांच्या प्रश्नाना उत्तरे

होमेश भुजाडे सर 
विचारवंत आणि लेखक 

सर्वप्रथम ST च्या आरक्षणाच्या अम्मलबजावणीसाठी महाराष्ट्रभर जन आंदोलन उभे करणा-या माझ्या समस्त सर्वसामान्य बंधू - भगिनीचे अभिनंदन !
तद्वतच मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन धनगरांसह तत्सम जमातींना ST च्या आरक्षणाच्या सवलती लागू व्हाव्यात म्हणून पुण्यात गेली दोन दिवस उपोषणाला बसून नुकतेच उपोषण मागे घेणारे प्रसिद्ध साहित्यिक सन्माननिय संजयजी सोनवणी सर यांचे शतशः ऋणानुभार ....
आदिवासीचे नेते म्हणून मिरवणा-यांच्या प्रश्नास उत्तर
---------------------------------------------

Saturday, July 26, 2014

धनगर आरक्षण संघर्ष आणि छुपे विरोधक

धनगर समाजाला भारतीय घटनेने दिलेले आदिवासी हक्क हे राज्यकर्ते मागील 1956 सालापासून धनगर
समाजाला नाकारत आले आहेत . प्रारंभी धनगर समाजाचे नावच हिंदी उच्चाराप्रमाणे धनगड असे आले
आहे ते यानी नाकारले .त्याच वेळी खालच्या वर्गाला आरक्षण असते तुम्ही कशाला मागता राव ? असा बुध्दिभेद केल्यामूळे 1960 ते 1970 चे काळात आशी मागणी करणारे डॉ. शेबडे यांना समाजाचा रोष सहन
करावा लागला .मात्र 1968 साली वकील झालेले अँड.गुंड़ेराव बनसोडे यानी कायदेशीररित्या ST
समावेश धनगर बांधवाना डॉ. शेबडे यांच्यासह प्रभुजी कोकणे, अघडतेगुरूजी समजाऊ लागले .तेव्हा लोक समजू लागले पण राज्यकर्ते बुध्दिभेद करतच होते .
त्यामुळे ST मध्ये समावेश करा ही मागणी (समावेश
असुनही )समाजात मर्जीतले पुढारी द्य्य्म पदे देऊन उभे करून त्यांचेकडून ही चुकीची मागणी रेटली जात
होती . Read more 

धनगरांच्या आदिवासी असण्याचे पुरावे

#SanjaySonawani-

कोणता समाज आदिवासी आहे आणि कोणता नाहीहे ठरवण्यासाठी केंद्राने खालील ५ निकष ठरवलेले आहेत.

(a)Indications of primitive traits;
(b)Distinctive culture;
(c)Geographical isolation;
(d)Shyness of contact with the community at large; and
(e)Backwardness

यानुसार धनगर समाज आदिवासी आहे कि नाही हे ठरवता येईल.

Thursday, July 17, 2014

धनगर आरक्षण संघर्ष यात्रा - २१ जूलै चलो बारामती

१७ जुलै २०१४
"फिटे अंधाराचे जाळे झाले होत आहे  मोकळे आकाश"
आज यात्रेचा तिसरा दिवस >>
आज सर्णव राज्यातील लोकांचा प्रतिसाद यात्रेला मिळू लागलाय  या पदयात्रेतील आनेक  संस्था ,संघटना ,पक्षाचे नेते  कार्यकर्ते सर्व गटातटाचे भेद विसरून " धनगर सारा एक " ही  मानसिकता त्यांच्या  सहवासातुन आज साकारली .सर्व राज्यभर झालेल्या फोन संपर्कामूळे नागपुर चंद्रपुरपासून समाज बांधव एक दिवस आगोदरच यात्रेकड़े येत आहेत 

Tuesday, July 15, 2014

महाराणी अहिल्याबाई होलकर जन्भूमि, चोंडी में शरद पवार - एक रिपोर्ट... - डॉ. जे.पी.बघेल ( साहित्यकार / लेखक / कवी )

महाराणी अहिल्याबाई होलकर जन्भूमि, चोंडी में शरद पवार - एक रिपोर्ट...
- डॉ. जे.पी.बघेल ( साहित्यकार/ लेखक / कवी )

साभार : पाल भारती, Monthly, October - 2013
संपादक - रोशनलाल पाल, ग्वालियर - मध्य प्रदेश

धनगर समाजाच्या आरक्षणाला पवारांचाच विरोध - महादेव जानकर

( साभार : दै. पुण्यनगरी, मुंबई, दी.15/07/2014 )

Monday, July 14, 2014

आरक्षण संघर्ष पदयात्रा


बरी आर्थिकस्थिति आसणारे धनगर बांधव जागे झाले आहेत आता प्रश्न नक्की सुटेल .कारण त्याना सधन नव्हे पण बरी आर्थिक परिस्थिति असलेमुळे तसा हतावरील पोटाचा प्रश्न नाही .ईथ पर्यंतच आंदोलन हातावरील पोट आसणारया जंगल दरयाखोर्या ,माळरानावरील वर्गाने प्रवाहाचे विरोधी पाहून चालवले आहे .


Sunday, July 13, 2014

महादेव जानकर- महाराष्ट्राचा कांशीराम


धनगर युवकांचे दहीवडीत उपोषण

आरक्षणासाठी धनगर समाजाचा संघर्ष


चौंडीतला शब्द शरद पवार पाळणार का ?


एस. टी. चे आरक्षण अबाधित; धनगरांवर अन्याय का ?


धनगरांचा राजकीय विजनवास


Thursday, July 10, 2014

धनगर-धनगडमध्ये शासनाकडून गफलत


धनगर-धनगड एकच!

"धनगर आरक्षणः वस्तुस्थिती व राजकारण" हा दहा जुलै रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. भौमिक देशमुख व रवींद्र तळपे यांचा लेख वाचला. वास्तवाचा विपर्यास करणारा हा लेख असल्याने त्याबाबत थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. "धनगर" छापण्याऐवजी "धनगड" छापले गेल्याने मुद्रणछपाईच्या चुकीचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे हे त्यांचे म्हणनेच चूक आहे. ती मुद्रण छपाईतील चूक नसून "र" चा उच्चार अनेकदा इंग्रजीत "ड" असा होत असल्याने ती झालेली भाषिक उच्चार-चूक आहे. ही चूक केंद्रीय मागासवर्ग आयोगाने दि. ३.१२.१२ रोजी उत्तर प्रदेशातील एका तक्रारीसंदर्भात मान्य केली असून "धनगड" ऐवजी "धनगर" हा शब्द

Wednesday, July 9, 2014

धनगरांच्या आरक्षणाचे काय झाले ?

त्या निमित्ताने हे दिसून येते कि सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्यांना १६% आरक्षण दिले. मुद्दा हा आहे कि इतर समाज घटकांच्या आरक्षणाच्या मागणीचे काय? हे सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? कि ते वंचित समाज घटक संघटनात्मक आंदोलनात कमी पडतात? पडतही असतील तरी ह्या सरकारची सामाजीक न्यायाची जाणीव बधिर झाली आहे काय?

Dhangar Reservation - HIGH COURT OF JUDICATURE AT ALLAHABAD

Court No.32.

Case :- WRIT - C No. - 40462 of 2009

Petitioner :- All India Dhangar Samaj Mahasangh U.P. And Others
Respondent :- State Of U.P. And Others
Petitioner Counsel :- R.C. Sinha,P.N. Saksena
Respondent Counsel :- C.S.C.

:::::::::::


Hon'ble Ashok Bhushan,J.
Hon'ble Mrs. Sunita Agarwal,J.
(Per Hon'ble Ashok Bhushan, J.)

Inclusion "Dhangar‟ in place of "Dhangad‟.

Earlier the Honble High Court of UP has passed order in the writ petition
no.40462/2009 of All India Dhangar Mahasbha Vs. Govt. of UP and others that
NCSC may decide the controversy over the Hindi version of Dhangar caste of UP.
The Commission asked the State Office, Lucknow to conduct an-on-the spot
enquiry and submit a report to the Commission on 17.10.2012.
The State Office, Lucknow conducted an enquiry into the matter. As per

चंद्रगुप्त, सम्राट अशोकाच्या धनगरांची पीछेहाट का ?


Tuesday, July 8, 2014

मुंडे साहेब आणि जानकर साहेब

मा.महादेवजी जानकर हे साहेबांचे मानसपुत्र आहेत... त्यामुळे रा.स.प. चा प्रत्येक कार्यकर्ता व नेता हा वंजारी समाजासाठी कुटुंबातला घटक झाला आहे.   साहेबांचे घर राष्ट्रवादीने फोडले तेव्हा जानकरांनी बहुजन समाजाची गरज म्हणून बीड जि.प. निवडणूकीत साहेबांचे काम करून समाजाची मोठी सहानुभूती मिळवली आहे. याची परतफेड म्हणून आ.पंकजाताईंनी बारामती मतदारसंघात झंझावात निर्माण करून सुप्रिया सुळे यांच्या वर मतदानासाठी रडण्याची व अजितदादावर मासाळवाडी गावात दमदाटी करण्याची वेळ आणली होती.

धनगरांचे अनुसुचित जमातींचे आरक्षण तांत्रिक चुकीने नाकारले गेले

संजय सोनवणी नांदेड येथील कार्यक्रमात बोलताना
१. धनगरांचे अनुसुचित जमातींचे आरक्षण तांत्रिक चुकीने नाकारले गेले आहे. ते कायदेशीर लढ्याने प्राप्त करून घेता येईल.

२. धनगर समाजाचा विखुरलेपणामुळे राजकीय दबावगट नाही. त्यामुळे कोणतेही सामाजिक प्रश्न सोडवून घेता येत नाहीत. महाराष्ट्रातील सर्वच धनगर समाजात परस्पर संपर्क आणि वैचारिक देवाणघेवाणीची गरज आहे.

धनगर ही कोणत्या मानववंश शास्त्रानुसार भटकी जमात ?

शरद पवारांनी धनगर समाज चुकुन "धनगड" या नांवाने शेड्युल्ड ट्राइब्जमद्धे सामाविष्ट असतांनाही ती चूक दुरुस्त करण्याऐवजी, तशा केंद्रीय मागासवर्ग आयोग व क्यगच्या सुचना असतांनाही त्यांना "भटक्या जमाती" (Nomadic Tribes) या नांवाने नवा प्रवर्ग निर्माण करुन त्यात टाकले.
आता धनगर ही कोणत्या मानववंश शास्त्रानुसार भटकी जमात झाली? रसेल, इंथोव्हेन सारखे मानववंश शास्त्रज्ञ ते आताचे केंद्रीय मागासवर्ग आयोग चुकाच करत गेले काय? त्या चुका असतील तर मग त्यांनी त्या

क्रांतिजोति सावित्रीबाई फुले विद्यापीठ हार्दिक स्वागत !

क्रांतिजोती सावित्रीबाई फुले विद्यापीठ झाल सहर्ष स्वागत !
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कधी ?
----------------------------
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ अस पुणे विद्यापीठाच नामकरण करणे सरकारला भाग पडले हे यश तुम्हा आम्हा फुलेप्रेमी जनतेच आहे .    याबद्दल सर्व फुलेप्रेमी बंधवाना खुप खुप धन्यवाद !
शिक्षणाची दार सर्व बहुजन समाजास प्रसंगी शेणगोळे अंगावर झेलुनही उघडली . त्या सावित्रीमायचा हा खरा गौरव आहे    ही मागणी रेटली नसती तर पुढची आनेक वर्ष हे घडल नसत आस मला वाटत .