Friday, July 4, 2014

धनगर सारा ऐक !

पाल महासभा ही उत्तरेतील धनगर समाजाची 1922 सालापासून कार्य करणारी संघटना आहे .पाल महासभेच्या बडोदा गुजराथ येथील आधिवेशनास  सर्वासोबत  विशेष आमंत्रित म्हणून मला उपस्थित रहाता आल. आपला धनगर  पशुपालक  समाज वेगवेगळी प्रादेशिक नावाऐवजी    धनगर हे  ऐकच  नाव सर्व उत्तर भारतात  आता   वापरु   लागला आहे. यातूनच पुढे सर्व देशभरातील धनगर समाजात  मानसिक एकरूपता व्हावी या  उद्देशान भारतीय धनगर परिषदेच काम उभ राहील .

       कुरंबा, ,कुरमा ,कुरमन्स ,कुरबर,गडरिया ,भारवाड,मालधारी, रायका ,देवासी ,गाडरी ,बकरवाल गड्डी पाल ,बघेल अशा ऐक ना अनेक प्रादेशिक  नावान संपूर्ण देशभर धनगर बांधव ओळखला जातो . धनगर हां बहुभाषिक समाज आहे.  पाण्याला  जसे इंग्रजीत वाँटर ,कानडीत नीर तर संस्कृतमध्ये जल म्हटलेमुळे पाण्याचे मुळगुणधर्म बदलत नाहित तसेच प्रत्येक भाषा वा प्रदेशामुळे धनगर समाजास वेगवेगळी नाव पडली आसली तरी पशुपालक धनगर बांधव देशभर हाडीमासी ऐकच आहे .
           पण तो मनाने अद्याप ऐक नाही .हि मानसिक एकता नसलेमुळे common line of thinking नाही मग त्यातून येणारी  common line of action कसी निर्माण होणार ? हा  खरा प्रश्न आहे याला उत्तर म्हणून प्रबोधन व समन्वय यासाठी  यातूनच भारतीय धनगर परिषद काम करू लागली .
जंगल व   रानोमाळातील पशुचराईमुळे  भटकंती यामुळे हाडामासानी ऐक असुनही ऐकमेकाचा  परिचय नाही .त्यामुळे  संघटन नाही . खरे तर संघटना हाच कलीयुगातील देव आहे .जे जे समाज संघटित तेच सजग व जागृत आसलेमुळे आपले स्वत:चे हितरक्षण करु शकले .मात्र असंघटित  धनगर समाजाचे सतत सजग व जागृती नसलेमुळे अहितच आजअखेर होत आले आहे .आदिवासी हाक्क असुनही आमलबजावणी न होण हा हि तोच प्रकार आहे .
          मी सांगली जिल्ह्यात राहतो शेजारी कर्नाटकच्या विजापुर ,बेळगाव जिल्ह्यात हजारो वर्षापासून तेथील कुरबर नावानी ओळखल्या जाणारया धनगर समाजासोबत विवाहसंबंधामुळे हाडीमासी आमच एकत्व आहे .या कर्नाटक राज्यातील धनगर समाजाचे याच पध्दतीने शेजारच्या आंध्र ,केरळ, तमिळनाडूतील कुरबा, कुरमन्स, कुरंबा नावाने ओळखल्या   जाणारया धनगरासी असेच एकत्व आहे .जसे की  "अ "हा  "ब" चा नातेवाईक आहे व "ब" हा "क " चाही नातेवाईक आहे म्हणजेच "अ " देखिल "क " चा नातेवाईक होतोच हे एकीच सूत्र आता आपण समजुन घेऊ या .त्यातूनच समर्थशाली संघटन उभ राहील.
     दक्षिण भारताप्रमाणे   उत्तर भारताशी  असेच स्नेहबांध आहेत  धूळे नंदुरबारचे धनगर गुजराथच्या भारवाड तर नागपुर चंद्रपुरचे धनगर बांधव मध्यप्रदेश व छत्तिसगढ़मधील पाल ,बघेल नावाने ओळखल्या जानारया धनगर समाजासोबत  जोडले गेले आहेत .गुजराथी धनगर राजस्थानशी हाडीमासी जूडले आहेत. हे प्रत्यक्ष सिध्द होतय
न मागता देखिल ५% आरक्षण ज्या मुस्लिम समाजाला मिळाल त्या मुस्लिम समाजा पेक्षा पशुपालक धनगर समाजाची लोकसंख्या देशात मोठी आहे .ते धनगर पशुपालन व्यवसायातील रानोमाळ च्या भटकंतीमुळे एकत्र कधी आलेच नाहित जंगल कायदे ,गायरान ,कुरणावरील वाढती कारखानदारीमुळे पशुपालन आड़चणीत आलय.तरी संघटन नाही .  या जंगल रानोमाळावरील  भटक्या  धनगर समाजाच संघटन     हे बेडकाच वजन करण्या ऐवढ आवघड  वाटतय पण आपल्या सर्वांच्या सहकार्यान मोबाईल ,फेसबुक ,वाट्सअपचे काळात हे नक्की होइल  कारण या मोकळया पारदर्शक काळात सत्य हाच परमेश्वर मानणारा धनगर समाज पुन्हा प्रामणिक शाशनकर्ती जमात होईल .रामायणकाळापासून या भूमित सत्यच जिंकत आलय .आता
गरज आहे सर्वांचे सहकार्याची 
मगच हाडीमासी  म्हणजेच    तनानी एक असणारा  समाज  मनानी व सामाजिक विकसासाठी धनाने देखिल पुढे एकत्र येईल. सर्वात महत्वाच म्हणजे संघटित शक्तिला शत्रु नसतो  त्यामुळे चंद्रगुप्त ,विजयनगरचे हाक्कराय बुक्कराय, वा होळकरशाही प्रमाणे "देश प्रथम " या न्यायाने वागणारा हा धनगर समाज देशाच्या  मुख्य प्रवाहात येईल सतवचनी हा समाज देशाला पुन्हा वैभवाकड़े घेउन जाणेत आपला मोठा वाटा उचलेल यात शंका नाही
   विजय ग.गावडे ,महासचिव
     भारतीय धनगर परिषद  
               सांगली
             7588167034

1 comments:

प्रकाश पोळ said...

विजय जी आपला लढा असाच चालू ठेवा...आम्ही आपल्यासोबत आहोत.