Showing posts with label samir maniyar. Show all posts
Showing posts with label samir maniyar. Show all posts

Wednesday, August 20, 2014

धनगर आरक्षण - महाराष्ट्र टाईम्समधील लेखावर प्रतिक्रिया

19 ऑगष्ट च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये समीर मणियार यांचा 'राखीव जागांचा येळकोट' हा लेख वाचला. सदर लेखात धनगर आरक्षणाबाबत चूकीची मांडणी केली आहे. त्यामुळे धनगरांच्या आरक्षण मागणीबद्दल गैरसमज पसरु शकतात. त्यामुळे ही दुसरी बाजू प्रसिद्ध करावी ही विनंती.

केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या मूळ यादीत महाराष्ट्रात 47 जमातींची नोंद आहे. (यातील दोन जमाती नंतर वगळण्यात आल्या आहेत) यात अनु. 36 वर oran, dhangad अशी नोंद आहे. यातील dhangad चा उच्चार धनगड, धांगड, धंगाद असा विविध प्रकारे होत असल्यामुळे सर्वांचाच गोंधळ झाला