Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts
Wednesday, May 31, 2017
Wednesday, January 27, 2016
मराठी कविता - महाराजा यशवंतराव होळकर
भारत भूमीच्या रक्षणाची, केली ज्यांनी गर्जना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।धृ।।
इंग्रजांना हरेक युद्धांत, ज्यांनी चारली हो माती
पळता भुई थोडी हे करती, इंग्रजांनी खाल्ली भीती
ज्यांच्या राष्ट्रकार्यामुळे, अभिमान वाटावा मना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०१।।
होळकरी काव्याने हे, महाराजा झुंजले किती
होळकरी बांडा झेंडा ज्यांनी, गाजविला भारती
ज्यांच्या पराक्रमापुढे झुकती, अजुनी सर्व माना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०२।।
एकाकी झुंजले परी, कधी नाही हार मानिली
सदा तलवारीच्या टोकावर, ज्यांनी आव्हाने पेलली
शिकवण ज्यांची सदा होती, ठेवा ताठ पाठीचा कणा
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०३।।
देशभक्तीमुळे इतिहासात जे, अजरामर हो झाले
स्वातंत्र्याची प्रथम ठिणगी जे, मनी पेटवूनी गेले
ही स्तुतिसुमने वाहतो, मिलिंद ज्यांच्या चरणां
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०४।।
ज्यांच्या पराक्रमापुढे झुकती, अजुनी सर्व माना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०२।।
एकाकी झुंजले परी, कधी नाही हार मानिली
सदा तलवारीच्या टोकावर, ज्यांनी आव्हाने पेलली
शिकवण ज्यांची सदा होती, ठेवा ताठ पाठीचा कणा
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०३।।
देशभक्तीमुळे इतिहासात जे, अजरामर हो झाले
स्वातंत्र्याची प्रथम ठिणगी जे, मनी पेटवूनी गेले
ही स्तुतिसुमने वाहतो, मिलिंद ज्यांच्या चरणां
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०४।।
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
'आम्ही धनगर' या कवितासंग्रहातून…
Labels:
कविता,
कविता.,
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
Tuesday, September 22, 2015
Monday, June 8, 2015
Wednesday, May 6, 2015
ऐसी थी महान, महारानी माँ अहिल्याबाई...
ऐसी थी महान , महारानी माँ अहिल्याबाई...
समाज का अंधकार नष्ट करके ,
परिवर्तन की ज्योत लायी !
पूरब से पच्छिम तक , उत्तर से दक्षिण तक,
जनहित के लिए , स्वार्थ बिना कार्य करते आयी !
सभी धर्म - जातियों - भाषाओंका का सन्मान करते हूए ,
सर्वधर्मसमभाव का आदर्ष लेकर आयी !
ऐसी थी महान , महारानी माँ अहिल्याबाई...
कई मार्गो , पुलों , जलाशयों , धर्मशालाओं निर्माण कराकर ,
एक बड़ी सामाजिक आवश्यकता की पूर्ति कराई !
तिस साल तक शांतिपूर्वक विशाल राज्य का ऐश्वर्य बढ़ाई...
सभी जाती , वर्ग , समाज , भाषा तथा देश - विदेश में प्रशंसा पायी !
दान - धर्म और 'समान न्याय ' देते हूए ,
अहिल्याबाई से 'अहिल्या ' 'देवी ' बन गयी !
थी ऐसी महान , महारानी माँ अहिल्याबाई...
- सुदर्शन अक्कीसागर
Labels:
कविता,
महाराणी अहिल्याबाई होलकर,
होळकर
Tuesday, March 24, 2015
Tuesday, December 2, 2014
Wednesday, October 1, 2014
कविता - वीरांगना भीमाबाई
भारतभूमी अजुनी गाती, शौर्यगीत या वीरांगनेचे
मर्दानी लढली इंग्रजांसवे, रक्षिण्या स्वातंत्र्य देशाचे
शोभे माता लाडाबाई, पिता महाराजा यशवंत
पण कैदेतल्या बालपणाचे, आले नशिबी दुर्भाग्य
महाराजांनी, विजयी करुनी, हडपसरचे युद्ध
मुक्त केले, जुलमी जाचातूनी, कुटुंब-कबिल्यास
सुटता पुण्यातील कैदेतूनी, सुरुवात झाली शिक्षणास
तलवारबाजी घोडेस्वारी सारख्या, लष्करी प्रशिक्षणास
होता उपवर भिमाई, आनंदे संपन्न झाला विवाह
पती लाभले, सरदार बुळे घराण्यातील, गोविंदराव
नियतीने योजिला होता, एक नवा वेगळाच डाव
विवाहाच्या फक्त दोनच वर्षांत, माथी आले वैधव्य
पण दु:खाने हताश होईल ती, 'यशवंत-कन्या' कैसी ?
दु:ख सारुनी येउनी मिळे, पित्याच्या स्वातंत्र्य कार्यासी
देखी तोफांचे कारखाने, होळकरी सैन्याची भरती
अश्व-निवडींवर देखील चाले, नियंत्रण भीमाबाई
सरता थोडा काळ, झाला आणखी एक आघात
हरवले पितृछत्र, महाराजा यशवंत स्वर्गवास
संधी साधून मोक्याची, गोरे फिरंगी प्रयत्न करीती
तरीही जिंकणे अशक्य होती, इंदुरची होळकरशाही
फिरंग्यांनी साधुनी कुटनीती, फोडले अनेक सेनानी
खून तुळसाबाईंचा करुनी, दिले प्रेत नदीत टाकुनी
काही वर्षांतच तोंड फुटले, महिद्पुरच्या युद्धाला
पण त्यातही फितुरीचे काटे नडले, होळकरी सैन्याला
युद्धात महिद्पुरच्या, होळकरांनी केली शौर्याची बरसात
पण फितूर झालेल्या गफूरखानाने, रण सोडले ऐन जंगेत
विजय कमळ हातूनी निसटले, झाला तह इंग्रजासंगे
पण भीमाबाई तेथून निसटे, तीन हजार पेंढारी संगे
सदा राहुनी अरण्यवासी, गनिमीकावा मंत्र जपे
फिरंगी भयभीत असती, भीमाबाई करी गनिमी-हल्ले
फिरंग्यांचे खजिने लुटले, केली उध्वस्त अनेक तळे
हल्ले असती अति रांगडे, माल्कमही पळून जाये
पाठवी पत्रे सर्व राजांना, विनंती असे एकत्र लढयाची
प्रतिसाद नसे कोणाचा, तरी चालू ठेविला एकाकी लढा
माल्कमने टाकला मग नवा डाव, केला फितूर रोशनखान
धार नजीक असता तळ, केझरने केला हल्ला तत्काळ
हल्ला झाला चोहोबाजूंनी, पडली एकाकी ही वीरांगना
अखेर झाली कैद, करुनी ठेविले रामपुरा गढीत बंधिस्त
दुर्भाग्य जणू ह्या वीरांगनेचे, मृत्यूही आला कैदेत
विसावला भीमाबाई नावाचा, स्वातंत्र्यासाठीचा झंझावात
ठेऊनी जान त्या कर्तुत्वाची, घ्यावे राष्ट्रकार्य भीमाईचे समजुनी
नमोनि विंनती करे मिलिंद, सर्वांच्या चरणी ! सर्वांच्या चरणी !!
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
मर्दानी लढली इंग्रजांसवे, रक्षिण्या स्वातंत्र्य देशाचे
शोभे माता लाडाबाई, पिता महाराजा यशवंत
पण कैदेतल्या बालपणाचे, आले नशिबी दुर्भाग्य
महाराजांनी, विजयी करुनी, हडपसरचे युद्ध
मुक्त केले, जुलमी जाचातूनी, कुटुंब-कबिल्यास
सुटता पुण्यातील कैदेतूनी, सुरुवात झाली शिक्षणास
तलवारबाजी घोडेस्वारी सारख्या, लष्करी प्रशिक्षणास
होता उपवर भिमाई, आनंदे संपन्न झाला विवाह
पती लाभले, सरदार बुळे घराण्यातील, गोविंदराव
नियतीने योजिला होता, एक नवा वेगळाच डाव
विवाहाच्या फक्त दोनच वर्षांत, माथी आले वैधव्य
पण दु:खाने हताश होईल ती, 'यशवंत-कन्या' कैसी ?
दु:ख सारुनी येउनी मिळे, पित्याच्या स्वातंत्र्य कार्यासी
देखी तोफांचे कारखाने, होळकरी सैन्याची भरती
अश्व-निवडींवर देखील चाले, नियंत्रण भीमाबाई
सरता थोडा काळ, झाला आणखी एक आघात
हरवले पितृछत्र, महाराजा यशवंत स्वर्गवास
संधी साधून मोक्याची, गोरे फिरंगी प्रयत्न करीती
तरीही जिंकणे अशक्य होती, इंदुरची होळकरशाही
फिरंग्यांनी साधुनी कुटनीती, फोडले अनेक सेनानी
खून तुळसाबाईंचा करुनी, दिले प्रेत नदीत टाकुनी
काही वर्षांतच तोंड फुटले, महिद्पुरच्या युद्धाला
पण त्यातही फितुरीचे काटे नडले, होळकरी सैन्याला
युद्धात महिद्पुरच्या, होळकरांनी केली शौर्याची बरसात
पण फितूर झालेल्या गफूरखानाने, रण सोडले ऐन जंगेत
विजय कमळ हातूनी निसटले, झाला तह इंग्रजासंगे
पण भीमाबाई तेथून निसटे, तीन हजार पेंढारी संगे
सदा राहुनी अरण्यवासी, गनिमीकावा मंत्र जपे
फिरंगी भयभीत असती, भीमाबाई करी गनिमी-हल्ले
फिरंग्यांचे खजिने लुटले, केली उध्वस्त अनेक तळे
हल्ले असती अति रांगडे, माल्कमही पळून जाये
पाठवी पत्रे सर्व राजांना, विनंती असे एकत्र लढयाची
प्रतिसाद नसे कोणाचा, तरी चालू ठेविला एकाकी लढा
माल्कमने टाकला मग नवा डाव, केला फितूर रोशनखान
धार नजीक असता तळ, केझरने केला हल्ला तत्काळ
हल्ला झाला चोहोबाजूंनी, पडली एकाकी ही वीरांगना
अखेर झाली कैद, करुनी ठेविले रामपुरा गढीत बंधिस्त
दुर्भाग्य जणू ह्या वीरांगनेचे, मृत्यूही आला कैदेत
विसावला भीमाबाई नावाचा, स्वातंत्र्यासाठीचा झंझावात
ठेऊनी जान त्या कर्तुत्वाची, घ्यावे राष्ट्रकार्य भीमाईचे समजुनी
नमोनि विंनती करे मिलिंद, सर्वांच्या चरणी ! सर्वांच्या चरणी !!
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
Labels:
कविता,
धनगर इतिहास,
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
Thursday, August 14, 2014
स्वातंत्र्य
किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला
तरुणान्नि तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला
तरुणान्नि तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले
Subscribe to:
Posts (Atom)




%2B-%2BMarathi%2BKavita%2B-%2BDhangarachi%2BJat%2BAmachi%2B(%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%2B%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%2B%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80%E2%80%A6%2B).jpg)
%2B-%2BMarathi%2BKavita%2B-%2BMi%2BAhe%2BDhangar%2B(%E0%A4%AE%E0%A5%80%2B%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%2B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E2%80%A6).jpg)