Showing posts with label अजित पवार. Show all posts
Showing posts with label अजित पवार. Show all posts

Sunday, August 10, 2014

महाराष्ट्रातील धनगरांच्या राजकीय अस्मितेचा खून कोणी केला ?

अजित पवार 
गेली दिड महिने लोकशाही मार्गानेच धनगरांचे ST आरक्षण अम्मलबजावणी करण्यासंबंधीचे आंदोलन सुरू आहे. काही तुरळक प्रकार सोडले तर हे आंदोलन अत्यंत संयमाने ,शांततेने व अहिंसक मार्गानेच सूरू आहे. या आंदोलनाचा कोणीही पूढारी नाही.गाव, जिल्हा, तालूका व शहरी स्तरावर सुरू असलेले हे आंदोलन त्या त्या भागातील तरूण व वृद्धांनी स्वयंस्पृर्तीने सुरू केलेले आहे. आंदोलना संबधी कोणत्यातरी पुढा-यांनी त्यांना सांगितले म्हणून केले असे मूळीच नाही. म्हणूनच हे जन आंदोलन ठरलेले आहे. नेत्यांच्या पुढाकाराशिवाय आंदोलन होऊच शकत नाही हा आतापर्यंतचा समज धनगरांच्या या आंदोलनाने खोटा ठरविलेला आहे.