Showing posts with label Dhangar. Show all posts
Showing posts with label Dhangar. Show all posts
Wednesday, September 9, 2015
Sri Sant Ramjibaba (श्री संत रामजीबाबा)
पुणे शहराच्या लगतच चिंचवड गावापासून अगदी जवळच असलेल्या चांदखेड ता. मावळ या गावी पेशवाईचे काळात धनगर (खाटीक) या समाजात रामजीबाबा नावाचे एक संत पुरुष होऊन गेले. रामजीबाबांचा व्यवसाय म्हणजे मेंढरांचे पालन-पोषण करणे हा पिढीजात धंदा होता. खंडोबाची उपासना त्यांच्या घराण्यात परंपरेने चालू होती. त्या उपसनेमधूनच त्यांच्या ठिकाणी असे काही वैराग्य निर्माण झाले की, संसारी असून देखील ते विरागी बनले. प्रभूचिंतनात त्यांचा सर्व काळ जात असे व चिंतनामधूनच त्यांना ईश्वर प्राप्ती झाली.
रामजीबाबा हे चांदखेड गावातील घोलप घराण्यातील. घोलप घराणे खंडोबाचे भक्त होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चांदखेड या गावीच झाला. रामजीबाबांचा संसार मावळ तालुक्यातच होता. त्या भागातील लोकांना वाटले की, संत तुकारामांनंतर हा एक त्यांच्याच मार्गाने जाणारा कोणीतरी दिव्य साधुपुरुष आपल्यामध्ये आवतरला आहे. त्यामुळे तेथील लोक बाबांच्या भजनी लागले. रामजीबाबांनी त्यांच्या आयुष्यात काही चमत्कार केल्याचे दाखले नाहीत. परंतु एकही चमत्कार न करतां देखील केवळ भक्तीमार्गांमुळे हजारो लोक त्यांच्या भजनी लागले होते.
रामजीबाबांनी तुकाराम महाराजांचे प्रमाणेच प्रपंच साधून परमेश्वाची सेवा व आराधना केली. रामजीबाबांची ओळख त्यावेळच्या समाज बांधवांना पटली नाही. परंतु समाजाच्या अत्यंत कठीण अवस्थेत त्यांनी लोकांना धीर दिला व भक्तीमार्गाने संकटाला सामोरे जाण्याचे शिकवले. काही लोकांनी त्यांची अवहेलना केली परंतु संताना देखील काही काळ अनुकूल असावा लागतो. त्या काळात अनेक संत महात्मे होऊन गेले. रामजीबाबा हे खंडोबाचे परमभक्त म्हणून ओळखले जावू लागले. समाजाला मार्गदर्शन करुन त्यांनी खंडोबाची भक्ती करण्याचा उपदेश केला.
रामाजीबाबा यांनी चांदखेड या गावीच आपला देह ठेवला व ते वयाच्या ५४ व्या वर्षी खंडोबाचे चरणी विलीन झाले. तो दिवस म्हणजे पौष शुध्द पौर्णिमेचा होता. दरवर्षी या तिथीला रामजीबाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरी केली जाते. महाराष्ट्रात शेकडो भक्त त्याठिकाणी जमतात. भजन, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतात. मुंबई येथील सर्वश्री बेंद्रे, खराटे, घोणे, घोडके या घराण्यातील लोक मोठ्या संख्येने येवून हा पुण्यतिथीचा सोहळा पार पडतात. समाजातील बाबांच्या भक्तांनीच चांदखेड येथील समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करुन भव्य सभा मंडप उभारला आहे.
अशा थोर संताचे चरणी आमचे विनम्र अभिवादन -
पवित्र जे कुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास जन्म घेती ।।
कर्म धर्म त्याने झाला नारायण । त्याचेचि पावन तिन्ही लोक ।।
संकलन - मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com
(टिप - सदरचा लेख मी लिहिला नसून, एका जुन्या पुस्तकात तो प्रकाशित झाला होता व ते पृष्ठ फक्त माझ्या हातीं लागले. प्रयत्न करुनही लेखक व पुस्तकाचे नाव कळू शकले नाही. जर कोणास लेखक किंवा पुस्तकासंबधी काही माहिती असल्यास जरुर कळवावे)
Saturday, September 5, 2015
Dr. Santuji Ramji Lad (डॉ. संतुजी रामजी लाड)
डॉ. संतुजी रामजी लाड हे एक थोर समाजसेवक व नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले तसेच महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सोबत त्यांनी मोलाचे समाजकार्य केले. डॉ. संतुजी लाड यांच्या जीवनकार्यांचा घेतलेला हा एक संक्षिप्त आढावा;
इ.स.
१८४१ मध्ये एका खाटीक-धनगर कुटुंबात जन्मलेल्या संतुजी यांनी ठाण्याच्या मिशनरी
शाळेत आपले शिक्षण घेतले. त्यानंतर डॉ. कीर्तीकर यांच्याकडे त्यांनी
वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला व एक निष्णात डॉक्टर बनले. डॉ.
संतुजी लाड यांच्या जीवनाचा अभ्यास करताना त्यांचा 'सत्यशोधक समाज' आणि
'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ' यांच्याशी आलेला संबंध व त्या
माध्यमांतून त्यांनी केलेले समाजकार्य यांचा प्रामुख्याने विचार करावा
लागतो.
डॉ. संतुजी लाड आणि सत्यशोधक समाज :
डॉ.
संतुजी लाड यांच्या जीवनावर कायम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा
प्रभाव राहिला. त्याच विचारांमुळे डॉ. संतुजी लाड सत्यशोधक समाजाकडे
आकर्षिले गेले आणि पुढे सत्यशोधक समाजाचे एक आघाडीचे नेते बनले. महात्मा
ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे समाजकार्य केले. सत्यशोधक
समाजाच्या इ.स.१८८५ च्या ठाणे येथील वार्षिक उत्सवात त्यांनी सक्रिय सहभाग
घेतला होता. नाशिक येथे इ.स.१९१२ साली भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या
परिषदेचे ते अध्यक्ष होते. फुले यांच्या उपदेशाची सत्यता, उपयुक्तता व
आवश्यकता यांचा आपल्यावर प्रभाव पडला व त्यानुसार आपण वर्तन करतो, असे
त्यांनी म्हटले होते. ठाणे येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या
अधिवेशनाचा खर्च डॉ. संतुजी लाड यांनी केला होता. 'दीनबंधू' ह्या साप्ताहिक
मुखपत्र त्याकाळी चालविले जात असे. पण काही आर्थिक कारणांनी ते डबघाईला
आले. त्यावेळी 'दीनबंधू' या वृत्तपत्राला त्यांनी आर्थिक मदत करून हे
वृत्तपत्र बंद पडू दिले नाही. 'दीनबंधू' हे साप्ताहिक मुखपत्र पुन्हा
नव्याने सुरु झाले, पण त्यासाठीं डॉ. संतुजी लाड यांना आपली सर्व संचित
संपत्ति खर्चावी लागली होती. 'दीनबंधू'ने इ.स.१८९६ च्या २३ फेब्रुवारीच्या
अंकात डॉ. संतुजी लाड यांचा 'प्रथम-भाषणकार' असा उल्लेख केला होता.
डॉ. संतुजी लाड आणि भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ:
महर्षि
विठ्ठल रामजी शिंदे यांनी विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यांसाठी
स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळामध्ये डॉ. संतुजी लाड हे
एक महत्त्वाचे मार्गदर्शक व साहाय्यकारी होते. तसेच मंडळाच्या पाच आद्य
संस्थापकांपैकी डॉ. संतुजी लाड हे एक होते. त्या पाच ही संस्थापकांची नावे व
पदे पुढीलप्रमाणे ; १. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे (सरचिटणीस), २. सर
नारायण चंदावरकर (अध्यक्ष), ३. शेठ दामोदरदास सुखडवाला (उपाध्यक्ष), ४.
नारायणराव पंडित (खजीनदार) आणि ५. डॉ. संतुजी रामजी लाड (अधीक्षक). भारतीय
निराश्रित साह्यकारी मंडळ अनेक सामाजिक तसेच प्रबोधनात्मक उपक्रम चालवत
असे, त्याचाच भाग म्हणून मंडळाने इ.स. २२ नोव्हेंबर १९०६ ते इ.स.१९०८ च्या
अखेर पर्यंत परळ येथे एक मोफत दवाखाना चालवला होता. या दवाखान्यात डॉ.
संतुजी लाड स्वतः रोज सकाळी ठाण्याहून स्वखर्चाने येत असत. त्यासाठीचा
प्रवासखर्चही ते कधी मंडळाकडून घेत नसत. अस्पृश्तेचे प्रमाण त्या काळात
अधिक होते. अस्पृश्य वर्गातील रोग्याला डॉक्टर साधे शिवूनही घेत नसत. पण
त्या काळात डॉ. संतुजी लाड अस्पृश्य रोग्याला शिवून, अतिशय प्रेमळपणाने
त्याची तपासणी करीत असत व उपचार करुन औषध देत असत. डॉ. संतुजी लाड यांच्या
सेवावत्तीबद्दल व त्यांनी केलेल्या साहाय्याबद्दल महर्षि विठ्ठल रामजी
शिंदे यांना फार कृतज्ञता वाटत होती. डॉ. संतुजी लाड ह्यांच्या जोडीने डॉ
एस.पी.नाशिककर हे ही मंडळाच्या दवाखान्याचे काम पाहत असत. डॉ. संतुजी लाड
केवळ दवाखान्यातच उपचार करत असत असे नव्हते, तर ते आजूबाजूच्या गरीब
वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार देखील करत असत. या
वैद्यकीय कार्यांव्यतिरिक्त डॉ. संतुजी लाड यांनी ठाणे येथे रात्रीची
शाळाही चालवली होती.
डॉ.
संतुजी लाड हे दीनदुबळ्यांना मदत करायला सदैव तत्पर असत. स्वभावाने अतिशय
प्रेमळ असणारे डॉ. संतुजी लाड कोणीही संकटांत सापडला असे कळले की, त्याच्या
साहाय्यासाठी धावत असत. आपल्या संपत्तीचा उपयोग त्यांनी सार्वजनिक
कामासाठी व गोरगरिबांच्या साहाय्यासाठीच केला. पंढरपूर ऑर्फनेजमधून त्यांनी
दोन मुली समाजाकडून मागून घेतल्या व त्यांचें प्रतिपालन करून त्यांची
लग्नेंही लावून दिली. सेवानिवृत्ती नंतरच्या काळात देखील मुंबई येथील मराठा
प्लेग हॉस्पिटलमध्ये 'हाऊस-सर्जन' म्हणून त्यांनी काम केले. प्लेग
हॉस्पिटलांत संपर्कात आलेल्या एका मुलाचे त्यांनी स्वतः उत्तम रीतीने
संगापेन केले होते. अत्यंत निस्वार्थीपणाने समाजाची शेवटपर्यंत सेवा
करणाऱ्या डॉ. संतुजी लाड यांचे कार्य वाखाण्याजोगेच आहे. अशा ह्या थोर
समाजसेवकाचे इ.स. १९१६ च्या अखेरीस पक्षाघाताच्या विकाराने निधन झाले.
डॉ.
संतुजी लाड यासारख्या एका निस्वार्थी थोर समाजसेवकाचे कार्य आपणां
सर्वांपर्यंत पोहोचावे एवढीच हा लेख लिहिण्यामागील माफक अपेक्षा !
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.comसंदर्भ -
१. Website - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई प्रस्तुत : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे - समग्र साहित्य
२. Website - Prabodhankar K S Thackeray's Life & Literature, Official Website
३. Book - 'Shahu Chhatrapati : A Royal Revolutionary' (1976) By Dhananjay Keer
४. Book - Jotirao Phule (1996) By Tarkteerth Laxmishastri Joshi, Daya Agarval
५. Book - 'Non-Brahman Movement In Maharashtra' (1989) By M.S.Gore
Labels:
Dhangar,
चळवळ,
ठाणे धनगर,
धनगर इतिहास,
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
Sunday, November 9, 2014
महाकवी कालिदास 'धनगर' होने के सबूत
अनेक वेबसाईट तथा ब्लॉगपर धनगर महापुरषोंकी सूचि में महाकवी कालिदासजी का नाम पाया जाता है। लेकिन उसीके लिखित सबूत उपलब्ध कराने के संदर्भ में मुझे कुछ संदेश आए थे। महाकवी कालिदास 'धनगर' होने के कुछ लिखित तथा दूसरे सबूत निचे दे रहा हूँ।
००१. 'Encyclopaedia of Scheduled Tribes in India: In Five Volume' (English) By P.K. Mohanty (Page No-84)
००२. 'Martial races of undivided India' (English) By Vidya Prakash Tyagi (Page No-205)
००३. 'Home, Again' (English Novel) By Dr. Ulhas R. Gunjal (Page No-146)
००४. 'Socio-Economic Issues of ‘Dhangar’ Nomadic Communities in Maharashtra' (English Journal) By S.M. Kamble
इन चार सबूतोंके अलावा महाकवी कालिदासजी के जीवनपर आधारित कुछ चित्रपटों में भी उन्हें धनगर ही दिखाया गया है।
००१. 'महाकवी कालिदास' (कन्नड) १९५५
००२. 'महाकवी कालीदासू' (तेलगू) १९६०
००३. 'कवीरत्न कालिदास' (कन्नड) १९८३
अभीभी महाकवी कालिदासजी के जीवन की इतर अनेक जानकारी में इतिहासकारों में विवाद है। महाकवी कालिदासजी के जीवनपर अधिक संशोधन होने की जरुरत है।
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
Labels:
All States,
Baghel,
Dhangar,
Gaddi,
Gaderia,
Kuruma,
Kurumbar,
धनगर इतिहास,
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
Saturday, August 30, 2014
रानकवी - यशवंत तांदळे
महाराष्ट्रातील विस्मृतीत गेलेले एक प्रतिभावंत साहित्यिक, रानकवी - यशवंत तांदळे यांच्याविषयी माहिती देणारा श्री. रघुराज मेटकरी लिखित लेख :
पृथ्वीमातेला पडलेले एक निरागस स्वप्न म्हणजे रानकवी यशवंत तांदळे. १९७६ साली ५१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कराड येथे भरलेले होते. या संमेलनात सहभागी व्हायला अनेक साहित्यिक जमलेले. या झकपक साहित्यिकांच्या गर्दीत मळकट धोतर, मळकट पांढरा शर्ट व लाल भडक मुंडासे आणि खांदयावर घोंगडे अशा अवस्थेत एक अडाणी धनगर व्यासपीठाजवळ आला. आणि "मला एक कुंडका म्हणू दया" अशा विनंत्या करू लागला. पण त्याच्याकडे लक्ष देते कोण ? संयोजक, निवेदक आपापल्या नादात गर्क. पण समोर
Labels:
Dhangar,
धनगर इतिहास,
धनगर समाज,
धनगर.,
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
Tuesday, July 29, 2014
पुरके -मोघे -पिचड -वळवी हे घ्या पुरावे
![]() |
Prof. Homesh Bhujade |
Homesh Bhujade, Writer & Social activists.
१)
पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष काकासाहेब कालेलकर यांच्या
अहवालानुसार धनगड व धनगर एकच असल्याचे नोंदवलेले आहे. धनगर हे अतिमागास
असून त्यांना आदिवासीच संबोधलेले आहे.
केंद्र सरकारने OBC करिता जरी हा आयोग स्विकारलेला नसला तरी SC व ST च्या अनुषंगाने सुचवलेल्या शिफारशी व दुरूस्त्या मात्र स्विकारलेल्या आहेत. मग धनगरांना ST चे आरक्षण का नाकारले जाते ?
केंद्र सरकारने OBC करिता जरी हा आयोग स्विकारलेला नसला तरी SC व ST च्या अनुषंगाने सुचवलेल्या शिफारशी व दुरूस्त्या मात्र स्विकारलेल्या आहेत. मग धनगरांना ST चे आरक्षण का नाकारले जाते ?
२) केद्र सरकारने डी. पी मंडल आयोग देशातील मागास जाती जमातीची पाहणी करण्यासाठी नेमलेला होता. त्या आयोगाने महाराष्ट्रातील सर्व भागात दौरे करून धनगर जमातीची पाहणी केली. तेव्हा त्यांनी 'धनगर ' व 'धनगड' या दोंन्ही जमाती वेगवेगळ्या नसून एकच असल्याचे अहवालात नोंदवलेले आहे.
या संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेत चिमणराव कदम यांनी वरिल विषयाच्या अनुषंगाने ८ एप्रील १९८२ रोजी सभागृहात प्रश्न सुद्धा उपस्थीत केलेला होता.
Subscribe to:
Posts (Atom)


%2B-%2BMD20141110%2B-%2BMahakavi%2BKalidas.jpg)
